Author: अनंत पांगारकर
कोपरगाव (महाराष्ट्र संवाद न्यूज) कोपरगाव तालुक्यातील जवळके-धोंडेवाडी चौफुलीवर दुचाकी आणि कंटेनरच्या अपघातामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली असून जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संगमनेर कडे जाताना या दांपत्याचा अपघात झाला. अशोक विठ्ठल गुंड (वय 58 वर्ष) व शोभा अशोक गुंड (वय 53 वर्ष रा. जळगाव, ता. राहाता, जि. अहमदनगर) हे दांपत्य शनिवारी (ता. 13 मे) सकाळी संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे नातेवाईकांकडे दुचाकीवरून जात असताना साडे आठ वाजण्याच्या दरम्यान जवळके-धोंडेवाडी चौफुलीवर रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातामध्ये अशोक गुंड यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी शोभा गुंड या…
(महाराष्ट्र संवाद न्यूज) राहत्या घराचे कुलूप तोडत घरामध्ये घुसलेल्या अज्ञात चोरट्याने तीन तोळ्याचे सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड रक्कम लांबविण्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील निमोण येथे घडला. विशेष म्हणजे चोरट्याने चांदीचे देवही चोरून नेले आहे. शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादी विकास हरिभाऊ मंडलिक (वय 38 वर्ष रा. निमोन, ता. संगमनेर) यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडत आतमध्ये प्रवेश मिळविला. चोरट्याने घरातील 29 हजार रुपये किमतीचे तीन तोळ्याचे सोन्याचे व चांदीचे दागिने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून नेले. चोरून नेलेल्या दागिन्यांमध्ये कानातील वेल, कानातले, पोत, चांदीचे 12 कॉइन व चांदीचे 2 देव, 1 शिक्का, दोन-तीन हजार रुपये चिल्लर व…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) नवीन वाळु धोरणाच्या अनुषंगाने वाळू डेपोपासून ग्राहकांच्या स्वखर्चाने त्यांच्या इच्छुक ठिकाणी वाळू पोहोच करण्यासाठी सहा चाकीपर्यंत सर्व गौणखनिज वाहतूक धारकांनी नोंदणी करण्याचे आवाहन अहमदनगरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाळु उत्खनन, वाळू डेपो निर्मिती व व्यवस्थापन यासाठी व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. नवीन वाळु धोरणानुसार वाळु डेपोपासुन ग्राहकांना स्वखर्चाने त्यांच्या इच्छुक ठिकाणी वाळु पोहोच करण्यात येणार आहे. ग्राहकांना वाळु पोहोच करण्यासाठी सहा चाकीपर्यंत सर्व गौण खनिज वाहतुकदार यांनी www.mahakhanij.maharashtra.gov.in/mahatrack/login या प्रणालीवर जाऊन नोंदणी करावी. वाहतुकीचे दर प्रादेशिक परिवहन अधिकारी, अहमदनगर यांनी निश्चित केल्यानुसार राहतील याची नोंद घ्यावी. तसेच याबाबतची सविस्तर माहिती www.nic ahmednagar.com या संकेतस्थळावर उपलब्ध…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) कर्नाटकमध्ये मोठ्या बहुमताने होत असलेला काँग्रेसचा विजय हा तेथील जनतेचा विजय आहे. भाजपचे दहशत आणि जातीभेदाचे राजकारण देशातील नागरिकांना मान्य नाही. कर्नाटक विधानसभा निकालने देशात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. देश व राज्यात काँग्रेस सरकारची गरज असून भाजपची घसरण सुरू झाल्याचे या निवडणूक निकालाने समोर आले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत होत असलेल्या काँग्रेसच्या मोठ्या विजयाचा आनंद संगमनेरमध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला. थोरात यांच्यासह श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते या…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) कर्नाटकमध्ये मोठ्या बहुमताने होत असलेला काँग्रेसचा विजय हा तेथील जनतेचा विजय आहे. भाजपचे दहशत आणि जातीभेदाचे राजकारण देशातील नागरिकांना मान्य नाही. कर्नाटक विधानसभा निकालने देशात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. देश व राज्यात काँग्रेस सरकारची गरज असून भाजपची घसरण सुरू झाल्याचे या निवडणूक निकालाने समोर आले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत होत असलेल्या काँग्रेसच्या मोठ्या विजयाचा आनंद संगमनेरमध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला. थोरात यांच्यासह श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते या…
(महाराष्ट्र संवाद न्यूज) ‘द केरला स्टोरी’ या बहुचर्चित चित्रपटाचे धर्म जागृती मोहिमेअंतर्गत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने संगमनेरमध्ये ३ शोचे मोफत आयोजन केले होते. संगमनेरकरांचा याला चांगला प्रतिसाद मिळाला. “द केरला स्टोरी” हा चित्रपट धर्मांतर व लव्ह जिहाद या विषयावर आधारित असून कट्टरपंथी जिहादी व आतंकवादी संघटना, देश विघातक संस्थाच्या षडयंत्राद्वारे महाविद्यालयीन विदयार्थीनी व अल्पवयीन मुली आपल्या जाळ्यात ओढून सिरिया- अफगाणिस्तान सारख्या देशांत पाशवी बलात्कार व अत्याचार करण्यासाठी पाठविल्या जातात. अश्या धर्मांध वृत्तीपासूनच्या अमानवीय कृत्यापासून हिंदू मुली व महिला भगिनींना वाचवण्यासाठी त्यांचे प्रबोधन म्हणून हा मोफत चित्रपट दाखवण्याचा संकल्प करण्यात आला होता. हिंदू धर्मजागृती मोहीम अंतर्गत विहिंप, बजरंग दल,…
सोनई (महाराष्ट्र संवाद न्यूज) माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुरलेले राजकारणी नाहीत. गद्दारांच्या खेळीला वैतागून त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असला तरी येणाऱ्या निवडणुकीत जनता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला साथ देईल असा विश्वास माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यातील दिग्गज राजकारणी आणि संयमी नेते म्हणून ओळख असलेल्या साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी त्यांच्या भेटीला आले होते. ठाकरे-गडाख भेटीत गडाख यांनी ठाकरेंचे तोंड भरून कौतुक करत ठाकरे आणि पवार यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. गडाख म्हणाले, ठाकरे कुटुंबाशी आमची मैत्री जुनी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझे संबंध मैत्रीपूर्ण होते. तेच संबंध…
विधानसभा अध्यक्ष एक चांगले वकील आहेत आणि ते कायद्यानुसार निर्णय घेतील… उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर (महाराष्ट्र संवाद न्यूज) सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सर्व अधिकार दिले आहेत आणि वाजवी वेळही दिली आहे आणि तरीही कोणी अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ती व्यक्ती मुक्त आणि न्याय्य प्रक्रियेच्या विरोधात आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील सत्ता संघर्षाबाबत विविध राजकीय पक्षांच्या वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहे. सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. याकरिता रिझनेबल वेळ देखील दिला आहे. दरम्यान यावर अध्यक्षांनी १५ दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्तुत्तर दिल. ते म्हणाले, विधानसभा अध्यक्ष हे…
नागपूर (महाराष्ट्र संवाद न्यूज) जाऊ द्या.. ते ज्येष्ठ नेते आहेत.. बोलत असतात.. इतकं लक्ष द्यायचं नसतं! अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांने केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना (ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा आणि नैतिकता यांचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही असा टोला लगावला होता. त्यानंतर विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानाची दखल घेत शरद पवारांनाही फडणवीसांनी प्रत्युत्तर…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शंकरराव खेमनर यांची फेरनिवड तर उपसभापतीपदी गीताराम गायकवाड यांची निवड करण्यात आली. बाजार समितीचे सभापती उपसभापती निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालकांची बैठक बोलाविण्यात आली होती. सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सचिव सतीश गुंजाळ यांनी काम पाहिले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत अध्यक्षपदासाठी शंकरराव खेमनर यांच्या नावाचे सूचना संचालक कैलास पानसरे यांनी मांडली. संचालक निलेश कडलग यांनी त्यांच्या नावास अनुमोदन दिले. उपसभापती पदासाठी गीताराम गायकवाड यांच्या नावाचे सूचना संचालक अरुण वाघ यांनी मांडली. या सूचनेला संचालक…
