महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यानच्या काळात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्याचे भारत सरकारने निश्चित केले आहे. यासाठी प्रत्येक टपाल कार्यालयात राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
हर घर तिरंगा या अभियानाला पाठबळ देण्यासाठी भारतीय टपाल कार्यालयातून राष्ट्रध्वजांची विक्री सुरु करण्यात आली असुन हे राष्ट्रध्वज प्रत्येकी २५ रुपयांप्रमाणे मिळणार आहे. स्थानिक टपाल कार्यालयातून नागरिकांना राष्ट्रध्वजाची खरेदी करता येईल.
याशिवाय नागरिकांना टपाल खात्याच्या www.epostoffice.gov.in या संकेतस्थळावरही ई- टपाल सुविधेच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची खरेदी करता येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिक्षक डाकघर सुरेश एल. बनसोडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

