Author: Anant Pangarkar
संगमनेर, दि. २६ मार्च – प्रतिनिधी परमपूज्य गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या अमृतवाणीतून १ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत संगमनेरच्या मालपाणी लॉन्सवर भव्य श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम कथा भाविक श्रोत्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. या माध्यमातून संगमनेर शहर लवकरच एका भव्य धार्मिक कार्यक्रमाचे साक्षीदार होणार आहे. १ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत दररोज दुपारी तीन ते सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान राधाकृष्णजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून संगमनेरकरांना श्रीराम कथा श्रवण करण्याचे सौभाग्य मिळणार आहे. या कथेदरम्यानच राधाकृष्णजी महाराज यांच्या रसाळ व गोड वाणीतून भजनाचा देखील आनंद लुटता येणार आहे. श्रीराम कथा श्रवणाच्या माध्यमातून श्रोत्यांना जीवनातील जगण्याचे…
मी संपूर्ण राज्याचा मंत्री आहे या तत्वाने वागणारे नेते, राजकारणातील तत्वनिष्ठ, ऋषितुल्य जीवन जगणारे, शेवटपर्यंत काँग्रेसचे, गांधीचे विचार जपणारे, गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ राहणारे, कुठलीही अपेक्षा न बाळगणारे तत्त्वनिष्ठ राजकारणी, पाटबंधारे मंत्री म्हणून महाराष्टात अनेक धरणाचे शिल्पकार परंतु हे मी केलं अस कधीही न सांगणारे तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व, संगमनेर साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक परंतु मी केलं किंवा माझं नाव द्या अस न सांगणारे राजकारणी, माजी आमदारांची मुलगी असतानासुध्दा आपल्या पत्नीला राजकारणात न आणणारे तत्वनिष्ठ पुढारी, माझ्या पुण्याईवर नाही तर स्वतःच्या कर्तृत्वावर राजकारणात या असा सल्ला आपले मुलं, नातवंडे यांना देणारे तत्वनिष्ठ पालक, मी सर्व जनतेचा लोकप्रतिनिधी आहे म्हणून स्वतःच्या नातेवाईक अथवा जवळच्या…
मुंबई, दि. २५ मार्च – विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “राज्यात कायद्याचे राज्य राहिले नसून अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे,” असा आरोप त्यांनी केला. दानवे म्हणाले, “हे सरकार कोत्या मनोवृत्तीने चालवले जात आहे. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. २०२४ मध्ये राज्यात ७ लाख ८२ हजार ९६० गुन्हे नोंदवले गेले आहेत. अमरावती विभागात दंगलीचे ५६४ गुन्हे घडले आहेत, नागपूरमध्ये ८८ हत्या झाल्या आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये बलात्काराच्या १६६ घटना घडल्या आहेत, आणि पुण्यात ५०६ गुन्हे घडले आहेत. तुरुंगातील कैद्यांची क्षमता २७ हजार ११४ असताना ४३ हजार…
संगमनेर, दि.२५ मार्च – प्रतिनिधी जम्मू-काश्मीरमधील तंगधार येथे कर्तव्य बजावत असताना संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावातील जवान रामदास साहेबराव बडे (वय ३८) यांना वीरमरण आले. त्यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. रामदास बडे हे जम्मू-काश्मीरमधील तंगधार जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. रामदास बडे हे ३४ एफ रेजिमेंटमध्ये हवालदार म्हणून कार्यरत होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते सैन्यात भरती झाले होते. त्यांच्या निधनाने मेंढवण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहीद रामदास बडे यांच्या पार्थिवावर उद्या (बुधवार, २६ मार्च) दुपारी १ वाजता त्यांच्या मूळ गावी, मेंढवण येथे शासकीय…
अहिल्यानगर, दि. २५ मार्च येत्या काही दिवसात संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संगमनेर कारखान्यासाठी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. तर प्रवरानगर येथील विखे पाटील कारखान्यासाठी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राहात्याचे तहसीलदार अमोल मोरे हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी…
मुंबई, दि. २५ मार्च – प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. यावर्षी, शिक्षकांना उन्हाळी सुट्टी मिळणार नाही. त्याऐवजी, त्यांना विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग घ्यावे लागतील. या वर्गांमध्ये, विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करून शिकवले जाईल. ३० जूनपर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्याला या विषयांमध्ये प्रवीण करणे हे शिक्षकांचे ध्येय असेल. हे विशेष वर्ग शालेय शिक्षण विभागाच्या ‘निपुण महाराष्ट्र’ अभियानाचा भाग आहेत. या अभियानाचा उद्देश राज्यातील दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता वाढवणे आहे. या कार्यक्रमाअंतर्गत, शिक्षकांना विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने शिकवावे लागेल. या उपक्रमात, राज्यातील दुसरी ते पाचवीच्या प्रत्येक वर्गातील किमान ७५% विद्यार्थ्यांना भाषा…
मुंबई, दि. २३ मार्च – विशेष प्रतिनिधी संगमनेर बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी उभारण्यासाठी २२०० स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून देण्याची तसेच, परिवहन विभागाशी संबंधित विविध विषयांचा संदर्भात मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे. संगमनेर तालुक्यातील विकासकामांना चालना देण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अकोले आणि संगमनेर तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी संगमनेरमध्ये स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याची मागणी देखील करण्यात आली. याव्यतिरिक्त, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बस स्थानकाच्या व्यापारी संकुलात दिव्यांग बांधवांना ३% गाळे वाटप करण्याची अंमलबजावणी करण्याची तसेच, संगमनेरच्या बी.ओ.टी. व्यापारी संकुलाला…
मुंबई, दि. २४ मार्च – विशेष प्रतिनिधी संगमनेर बसस्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागेची उपलब्धता करून दिली. मात्र हे स्मारक अधिक भव्य आणि भव्य दिव्य ठरावे यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याचा मार्ग संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ उपस्थित होते. तांबे म्हणाले, २१ ऑगस्ट २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, हे स्मारक…
ठाणे, दि. २४ मार्च – प्रतिनिधी संगमनेरमधील डॉ. सुधाकर पेटकर यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ठाण्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात डॉ. पेटकर यांचा गौरव करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळाच्या वतीने ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ३४ राज्यस्तरीय काव्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या हस्ते डॉ. पेटकर यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. डॉ. सुधाकर पेटकर यांचे ‘चंदनाचे हात’ हे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाची प्रस्तावाना जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे यांनी लिहिली आहे. डॉ. पेटकर यांच्या आत्मचरित्राला…
संगमनेर, दि. २४ मार्च – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील चिकणी गावात वन जमिनीच्या बेकायदेशीर नोंदी करून जमिनी हडपण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत त्या सहा व्यापाऱ्यांच्या नावावर नोंद करण्यात आलेल्या व महसुली दस्तऐवज असलेल्या सातबारावरील अवैध नोंदी रद्द केल्या आहेत. तसेच, या प्रकरणात दोषी आढळलेल्या संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत महसूल विभागाच्या सूत्रांनी दिले आहेत. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील चिकणी गावात सुमारे ८० हेक्टर वन जमिनीवर काही व्यापाऱ्यांनी महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने बेकायदेशीर नोंदी केल्या होत्या. या नोंदींच्या आधारे सदर जमीन हडपण्याचा…