Author: अनंत पांगारकर
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आपली प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक बाबींमध्ये लाभ होण्याचे योग आहेत, परंतु अनावश्यक खर्च टाळणे योग्य ठरेल. कौटुंबिक वातावरणात आनंद आणि सलोखा राहील. आहारावर नियंत्रण ठेवून आरोग्याची काळजी घ्या. वृषभ – आज आपल्याला धैर्याने आणि संयमाने काम करण्याची गरज आहे. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधल्यास जुने मतभेद मिटतील. संध्याकाळी एखादी चांगली बातमी कानावर पडण्याची शक्यता आहे. मिथुन – आजचा दिवस सर्जनशीलता आणि नवीन कल्पना राबवण्यासाठी उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर पोलीस प्रशासनाने १५ आणि १६ ऑगस्ट रोजी अकोले तालुक्यातील भंडारदरा व परिसरातील पर्यटन स्थळांवर होणारी प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रंधा फाटा ते भंडारदरा मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. स्वातंत्र्यदिन आणि त्याला जोडून आलेल्या शनिवार व रविवारी पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे आणि अहिल्यानगर येथून मोठ्या संख्येने पर्यटक भंडारदरा, रंधा धबधबा, कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड व कोकण कडा परिसरात येण्याची शक्यता आहे. या परिसरातील रस्ते अरुंद असून काही ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: दरवर्षी नवनवीन आणि अभिनव उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या संगमनेर येथील प्रसिद्ध ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’ने यंदाच्या गणेशोत्सवात ‘डिजिटल इंडिया’ आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कागदी पावती पुस्तकांचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्गणी संकलनासाठी ‘डिजिटल पावती पुस्तक’ वापरणारे बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळ हे संगमनेर शहरातील पहिलेच मंडळ ठरले आहे. गणेशोत्सवाच्या वर्गणीसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कागदी पावत्या छापल्या जातात. मात्र, डिजिटल युगाची गरज ओळखून मंडळाचे मार्गदर्शक व नगरसेवक योगेश (चिकू) जाजू यांच्या संकल्पनेतून हे विशेष मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. आता मंडळाचे कार्यकर्ते घरोघरी आणि दुकानांमध्ये जाताना पावती पुस्तक न नेता मोबाईलमधील ॲपद्वारे वर्गणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेरमध्ये अवैध दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोठे कारवाई केली. संबंधित ठिकाणी सातत्याने कारवाया झाल्याने आरोपींच्या आस्थापना कायमस्वरूपी सील करण्याची मागणी दारूबंदी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख अमर कतारी यांनी केली आहे. संगमनेर शहरात गोवा बनावटीची व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली बनावट दारू विक्री करणाऱ्यांविरोधात संगमनेरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ६ ऑगस्ट रोजी मोठी कारवाई केली. या कारवाईत ‘रॉयल इम्पॅक्ट’ व्हिस्कीचे ३४ बॉक्स, विविध नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, बनावट दारू बनवण्याचे साहित्य आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पथकाने शिवाजी नगर, वडजे मळा परिसरातील…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. व्यापाऱ्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता असून जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. मन शांत ठेवण्यासाठी नामस्मरण किंवा ध्यानधारणा करणे फायदेशीर ठरेल. वृषभ – आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कामाचा ताण थोडा वाढू शकतो, त्यामुळे नियोजनबद्ध रीतीने काम करणे गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा आणि विनाकारण खर्च करणे टाळा. कौटुंबिक जीवनात लहान-सहान कारणांवरून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: राज्यातील शिक्षण व्यवस्थेचा दर्जा ढासळत असून शासन नवीन शिक्षक भरती करण्याऐवजी शिक्षकांना अतिरिक्त ठरवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करत असल्याचा घणाघाती आरोप ‘छात्र भारती’ विद्यार्थी संघटनेने केला आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणा विरोधात हजारो विद्यार्थी मोर्चाने रस्त्यावर उतरले होते. यात विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. बदलत्या शैक्षणिक धोरणांविरोधात छात्र भारतीने तीव्र आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन संगमनेरचे प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून देत त्वरित कार्यवाहीची मागणी केली आहे. गेल्या १२ वर्षांपासून राज्यात योग्य प्रमाणात शिक्षक भरती न झाल्यामुळे शिक्षण व्यवस्थेची अवस्था बिकट झाली आहे. यावर मार्ग काढण्याऐवजी…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा घेऊन येणारा ठरेल. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहील आणि जवळच्या लोकांचे पूर्ण सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तुम्ही तयार असाल. आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. फक्त घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा आणि आरोग्याची योग्य काळजी घ्या. वृषभ – आजचा दिवस संयम आणि शांततेने घालवण्याचा आहे. मनामध्ये अनेक प्रकारचे विचार एकाच वेळी येतील, ज्यामुळे थोडे मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. आर्थिक बाबींमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक खर्च टाळा. जोडीदारासोबत संवाद चांगला ठेवल्यास नात्यातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: आश्वी परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या एका धक्कादायक घटनेत अज्ञात दोन भामट्यांनी एका ७० वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली आहे. आश्वी-प्रतापपूर रस्त्यावरील आंधळे पेट्रोल पंपाजवळ बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली असून, या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतापपूर येथील रहिवासी असलेल्या ७० वर्षीय शकुंतला गंगाधर चतुरे या आंधळे पेट्रोल पंपाजवळ चहाची टपरी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास त्या दुकानात असताना दोन अज्ञात इसम तेथे आले. त्यांनी चहा मागण्याच्या बहाण्याने शकुंतला यांच्याशी संवाद साधला. दुकानात आणि आसपास गर्दी नसल्याचा फायदा घेत या भामट्यांनी अचानक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर (प्रतिनिधी): नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरलेला निसर्गरम्य ‘तामकडा’ धबधबा प्रवाहित झाला असून या तामकड्याचे जलपूजन संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. हिरव्यागार वनराईच्या कुशीतून वाहणारा हा पांढराशुभ्र धबधबा परिसरातील नागरिकांसह प्रवाशांसाठी मोठा आनंददायी ठरत आहे. जलपूजनानंतर बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, अकोले व संगमनेर तालुका हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला निसर्गरम्य परिसर आहे. बाळेश्वर पर्वतावरून वाहणाऱ्या नदीमुळे घाटातील हा सुंदर तामकडा निर्माण झाला असून पावसाळ्यात तो पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. नाशिक-पुणे महामार्गावरून प्रवास करताना अनेक पर्यटक व नागरिक या ठिकाणी थांबून निसर्गाचा आनंद घेतात.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शेकडो वर्षांची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या संगमनेरच्या मानाच्या पहिल्या गणपती श्री सोमेश्वर रंगारगल्ली मित्र मंडळाच्या गणेशोत्सव २०२६ च्या अध्यक्षपदी रोशन आमले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. रंगारगल्ली येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात मंडळाच्या ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करून नूतन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या नूतन कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी अभिजीत पाटणकर, तर उपाध्यक्षपदी संकेत काजळे व ऋषिकेश पवार यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदाची जबाबदारी अक्षय ढोरे यांच्याकडे तर सहसचिवपदाची जबाबदारी प्रथमेश गरुडकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मंडळाच्या तिजोरीची धुरा खजिनदार देवेंद्र काळे व कैलास बुरसे सांभाळणार असून प्रकल्पप्रमुख…
