महाराष्ट्र संवाद न्यूज
पुणे : प्रदूषण कमी करण्यासाठी, वाहतूक कोंडी मधून पुणेकरांची सुटका होण्यासाठी आता हवेतून चालणाऱ्या बस सुरू करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री होते उपस्थित: केंद्रीय वाहतूक आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे आज लोकार्पण झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.
गडकरी म्हणाले: पुण्यातील वाढती वाहनांची संख्या, प्रदूषण, कचरामुक्त पुणे यासाठी गडकरी यांनी उपाय सुचवत माझ्याकडे पुण्यासाठी हवेतून चालणाऱ्या स्काय बसची कल्पना आहे. माझी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांना विनंती आहे की, त्यांनी याचे एकदा प्रेझेंटेशन पाहावे. या स्कायवॉक बसमधून एका वेळेस अडीचशे प्रवासी प्रवास करू शकतात. पुण्यात आधीच वाहतूक कोंडी असल्याने यात आणखी वाहनांची भर घालू नका. कारण इथे प्रदूषण जास्त झाल आहे. आपल्याला पेट्रोल, डिझेलला देशातून हद्दपार करायच असून त्यामुळे 40% प्रदूषण कमी होऊ शकते.
सायरनचा आवाज, व्हीआयपी कल्चर गेलं पाहिजे, त्यासाठी पुण्याच्या विकासाकरिता 40,000 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये दोन-तीन मजली उड्डाणपूल आहेत. रिंग रोडही लवकरच पूर्ण होईल. मेट्रोचे काम आता शेवटच्या टप्प्यात असून आपण आता पुण्यासाठी हवेतून चालणाऱ्या स्काय वॉक बसची योजना आणली जाणार आहे.
पुणेकरांकडून तीन मागण्या सातत्याने होत होत्या. यामध्ये पुणे मेट्रोचे काम पूर्ण करण्यात यावं, एअरपोर्टचा विकास करण्यात यावा आणि चांदणी चौक पुलाचे काम करण्यात यावे. यातील दोन गोष्टी पूर्ण झाल्या असून आता मेट्रोचे कामही पूर्ण होत आहे, असे गडकरी म्हणाले.

