शुक्रवार, २७ डिसेंबर
विशेष प्रतिनिधी / मुंबई
देशाचे यशस्वी पंतप्रधान मनमोहन सिंग याचे सरकार उलथवून टाकण्यासाठी दिल्लीत आंदोलनाची हाक देणारे समाजसेवक अण्णा हजारे यांना उपरती झाली आहे. मोदींच्या भ्रष्ट सरकारवर एका शब्दात टीका न करणारे अण्णा हजारे यांनी मनमोहन सिंग यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहे. ‘आर्थिक सुधारणांचे जनक’ अशा शब्दात हजारे यांनी सिंग यांना आदरांजली वाहिली. 
समाज माध्यमामध्ये या स्तुतीवर जोरदार टीका होत आहे.
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे काल, गुरुवारी रात्री निधन झाले. सिंग यांच्या निधनाबद्दल देशभरातील आणि परदेशातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
यूपीए सरकारच्या काळात भ्रष्टाचारविरोधी आंदोलन करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करताना, देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये त्यांचे मोठे योगदान असल्याचे म्हटले आहे. केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकार असताना हजारे यांनी दिल्लीत मोठे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन केले होते.
हजारे यांनीही मनमोहन सिंग यांच्या जाण्याबद्दल दु:ख व्यक्त केले. डॉ. मनमोहन सिंग यांनी नेहमीच देशाचा विचार केला. देशाची अर्थव्यवस्था बदलण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. ते पंतप्रधान असताना मी भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करत होतो. त्यावेळी मी त्यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दोनवेळा भेटलो आणि ते खूप झटपट निर्णय घेत होते. आज ते आपल्यात नसले तरी, त्यांच्या आठवणी सदैव जिवंत राहतील.
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणारे अण्णा हजारे २०११-१२ मध्ये दिल्लीतील रामलीला मैदानावर बेमुदत उपोषणाला बसले होते. त्यामुळे तत्कालीन मनमोहन सिंग सरकार बॅकफूटवर आले होते. तसेच, राजकीयदृष्ट्या काँग्रेसला या आंदोलनाचा फटकाही बसला होता. तथापि, त्यावेळचे अण्णा हजार यांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना करून राजकारणात प्रवेश केला आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने दिल्लीत पहिले सरकार स्थापन केले,

