Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नशामुक्त श्रीरामपूरचा ध्यास: उद्या शहरात भव्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे श्रीरामपूर पोलिसांचे आवाहन

20/08/2026

संगमनेरात राजस्थान युवक मंडळातर्फे २२ ऑगस्टपासून चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमाला!

20/08/2026

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड

20/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देणार: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
राजकारण

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देणार: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन शेतकरी भवन व उपहारगृहाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

राहुरी:

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण असून, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली. 

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन शेतकरी भवन व उपहारगृहाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार काशीनाथ दाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्या नफ्यात व काटकसरीने चालवण्यावर भर दिला. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे उत्पादन वाढवण्याचे, फळबाग लागवडीचे आणि शाश्वत शेती पद्धतीचे अवलंबन करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. नवीन पिढीने पर्यावरणपूरक व कचरामुक्त शहर उभारणीत पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा उल्लेख करताना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी २० लाख घरे मंजूर झाली असून, त्यांच्या बांधकामासाठी ५ ब्रास वाळू मोफत दिली जात आहे. ‘लाडकी बहीण योजने’साठी ४५ हजार कोटींची तरतूद असून, अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील भगिनींनाच याचा लाभ मिळेल. नोकरदार कुटुंबांतील सदस्यांनी या योजनेचा लाभ न घेण्याचे आवाहन केले.

राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी २० हजार कोटी रुपये, तर शून्य टक्के व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. शेतकरी कल्याणासाठी दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद करून पाच वर्षांत २५ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. दिव्यांग लाभार्थ्यांचे संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत मासिक मानधन दीड हजार रुपयांवरून अडीच हजार रुपये करण्यात आले आहे. कांद्याच्या खरेदीसाठी नाफेडमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून, शासनाला राज्याच्या उत्पन्नाच्या मर्यादेत कर्ज घेण्याची मुभा आहे. देशाच्या एकूण जीएसटीपैकी महाराष्ट्राचा वाटा १६ टक्के असून, त्यातील ८ टक्के वाटा राज्याला मिळतो.

पुणे – अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गास केंद्र शासनाने मंजुरी दिली असून, भूसंपादन करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल, असेही पवार यांनी नमूद केले. यामुळे शेतमालाची वाहतूक सुलभ होणार आहे. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा कार्यान्वित झाली असून, सुसज्ज टर्मिनललाही मंजुरी मिळाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील भाविक शिर्डीला भेट देऊ शकतील, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाचे कौतुक करताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ही बाजार समिती राज्यातील पहिल्या दहा उत्कृष्ट बाजार समित्यांमध्ये समाविष्ट आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 469
अजित पवार राहुरी बाजार समिती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

निझर्णेश्वर मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा करणार: आमदार अमोल खताळ

17/08/2026

नाशिक-पुणे रेल्वे: पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या वक्तव्याचा नाशिक-पुणे रेल्वे कृती समितीकडून तीव्र निषेध

08/08/2026

संगमनेर तालुक्यासाठी ३५७ मेट्रिक टन युरियाचा बफर स्टॉक खुला; आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर कृषी विभागाची कारवाई

07/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आवाहन

नशामुक्त श्रीरामपूरचा ध्यास: उद्या शहरात भव्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे श्रीरामपूर पोलिसांचे आवाहन

By Annant Ppangarkar20/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूर: श्रीरामपूर शहर व परिसरात वाढत्या अंमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेला अटकाव घालण्यासाठी…

संगमनेरात राजस्थान युवक मंडळातर्फे २२ ऑगस्टपासून चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमाला!

20/08/2026

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड

20/08/2026

गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

20/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.