रामराज्य शस्त्राने नव्हे, तर संस्कार आणि सदाचाराने येते: रामायणाचार्य ढोक महाराज
रामायणाचा खरा आदर्श हा बंधुभावात दडलेला असून गुरूमिलन, मातृभक्ती, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा हीच रामायणाची खरी शिकवण आहे

गुंजाळवाडी येथे आयोजित परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहातील रामकथेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. सुमारे सात लाख भाविकांनी या ज्ञानयज्ञाचा लाभ घेतला असल्याचे संयोजकांनी म्हटले आहे, कथेच्या सांगतेनंतर महाप्रसादासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती.
या सोहळ्याला राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार अमोल खताळ, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कथा समितीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे, उद्योजक आबासाहेब थोरात, संजय पाटणकर, कपिल पवार यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
