गगनगिरी महाराजांच्या सप्ताहाची सांगता; निसर्गाचे जतन व संवर्धनाचा संदेश… निसर्ग जपणे हीच गगनगिरी महाराज व ईश्वराची खरी सेवा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात
वारी आणि सप्ताहाच्या माध्यमातून आयोजकांकडून होणारे वृक्षवाटप हा केवळ महाप्रसाद नसून, ती भविष्याची गरज आहे.



या सोहळ्याला व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दिलीप शिंदे, आबासाहेब थोरात, राजेंद्र गुंजाळ, हेमंत पवार, महाराजांचे नातेवाईक माने सरकार, पाटणकर सरकार, नवनाथ महाराज आंधळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गगनगिरी महाराजांचे संगमनेर तालुक्यावर नेहमीच अथांग प्रेम आणि आशीर्वाद राहिले आहेत, याची आठवण करून देत थोरात यांनी पर्यावरण संवर्धनावर विशेष भर दिला. वारी आणि सप्ताहाच्या माध्यमातून आयोजकांकडून होणारे वृक्षवाटप हा केवळ महाप्रसाद नसून, ती भविष्याची गरज आहे. २००२ मध्ये लावलेली झाडे आज फळे देत आहेत, त्यामुळे प्रत्येकाने दिलेले वृक्ष जोपासले पाहिजेत. वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर राजकारण, श्रीमंत-गरीब किंवा लहान-मोठा असा कोणताही भेद नसतो, येथे सर्वजण समान भावनेने हरिनामाच्या गजरात लीन होतात, असेही ते म्हणाले.