खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा फुसका बार; वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांचा थेट हल्लाबोल
'ऑपरेशन टायगर' सारख्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांचे नाव सातत्याने पुढे येत असले, तरी शिर्डी लोकसभेचा एकही प्रलंबित किंवा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी संसदेत आक्रमकपणे मांडला नाही



रूपवते यांनी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या गेल्या दोन वर्षांतील कारकिर्दीवर थेट आणि धारदार शब्दांत टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत खासदार वाकचौरे यांच्या कामगिरीचा जाहीर पंचनामा केला.
या जाहीरनाम्यातील कोणती कामे कुठपर्यंत आली, यावर खासदारांनी किंवा त्यांच्या टीमने जाहीरपणे आपली भूमिका मांडायला हवी होती. पाच वर्षांच्या कार्यकाळात सर्वच कामे पूर्ण होऊ शकत नाहीत आणि कोणाकडेही जादूची काडी नाही, हे आम्हालाही समजते, पण किमान जनतेसमोर येऊन आपल्या कामाची वस्तूस्थिती मांडणे हे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे कर्तव्य होते, ज्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.
खासदारांचा अजून तीन वर्षांचा कार्यकाळ बाकी असून त्यांनी राजकीय उलथापालथींमध्ये न गुंतता, ज्या जनतेने त्यांना निवडून दिले आहे त्यांच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे.