

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी: रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आमदार अमोल खताळ यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा लागू करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं आश्वासन आपल्या भगिनींना दिलं. डिसेंबरमध्ये नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून, कायदा लागू होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
आमदार खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात रक्षाबंधनानिमित्त संगमनेर शहर आणि तालुक्यातील अनेक भगिनींनी त्यांना राखी बांधली. यावेळी, प्रेमाच्या नावाखाली हिंदू युवतींना फसवून त्यांचं जबरदस्तीने धर्मांतर करणं, शारीरिक आणि मानसिक छळ, लैंगिक अत्याचार आणि आत्महत्यांसारख्या घटना वाढत असल्याबद्दल भगिनींनी चिंता व्यक्त केली. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणी त्यांनी आमदार खताळ यांच्याकडे केली.
आमदार खताळ म्हणाले की, धर्म आणि देशाच्या रक्षणासाठी मी नेहमीच पुढाकार घेईन. माझ्या सर्व भगिनींनी यापुढेही मला साथ द्यावी. महिलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. जर कोणीही कोणत्याही महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर माझ्याशी गाठ आहे. यावेळी, त्यांनी हिंदुत्वाचं प्रतीक म्हणून उपस्थित असलेल्या सर्व भगिनींना भगवे वस्त्र भेट म्हणून देऊन त्यांचा सन्मान केला.
गो तस्करीवरही भाष्य- आमदार खताळ यांनी यावेळी गो तस्करीचा मुद्दाही उपस्थित केला. मागील काळात गो तस्करांनी गोरक्षकांवर हल्ला केला होता, त्यावेळी काही अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय होता. त्यामुळे, आपण विधानसभेत आवाज उठवून कारवाईची मागणी केली होती. या प्रयत्नांमुळे आता संगमनेरमध्ये गो तस्करी मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.



आमदार खताळ म्हणाले की,
