

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी: राजापूर ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता असूनही गावातील मूलभूत प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप करत गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतल्यानंतर विरोधक निराधार आरोप करत आहेत. या बिनबुडाच्या आरोपांना मी भीक घालणार नाही, असा स्पष्ट इशारा संदेश देशमुख यांनी दिला आहे.
देशमुख म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून गावात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली बेकायदेशीर कामे सुरू असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. या चुकीच्या कामांविरोधात आवाज उठवल्यामुळेच आपल्याला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहे. पण आपण कोणत्याही दबावाला बळी न पडता यापुढेही आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली चुकीच्या कामांना विरोध करतच राहणार असल्याच सांगितलं.
आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांमुळे गावातील शेतकऱ्यांना कोणतीही किंमत न घेता वीजजोडणीसाठी आवश्यक असलेली डीपी तातडीने उपलब्ध करून दिल्याचे देशमुख यांनी सांगितले. तसेच, राजापूरमधील सत्ताधाऱ्यांवर टीका करताना ते म्हणाले, ग्रामसभा ही गावातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी असते, ग्रामपंचायतीची मालमत्ता लाटण्यासाठी नव्हे. सध्याच्या सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांना ग्रामसभेचे उद्दिष्टच कळले नसल्याची टीकाही त्यांनी केली.



आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांमुळे गावातील शेतकऱ्यांना कोणतीही किंमत न घेता वीजजोडणीसाठी आवश्यक असलेली डीपी तातडीने उपलब्ध करून दिल्याचे देशमुख यांनी सांगितले. तसेच, राजापूरमधील सत्ताधाऱ्यांवर टीका करताना ते म्हणाले, ग्रामसभा ही गावातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी असते, ग्रामपंचायतीची मालमत्ता लाटण्यासाठी नव्हे. सध्याच्या सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांना ग्रामसभेचे उद्दिष्टच कळले नसल्याची टीकाही त्यांनी केली.
