महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
मुंबई, दि. १८ ऑगस्ट: पुण्यात पोलिसांचे ‘जंगलराज’ सुरू आहे का, असा संतप्त सवाल विचारत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. कोथरूड पोलिसांनी तीन तरुणींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार असूनही, दोषी पोलिसांवर कारवाई करण्याऐवजी उलट पीडित तरुणींवरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केल्याने हा ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचा प्रकार असल्याची घणाघाती टीका सपकाळ यांनी केली आहे.
१ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेनंतर पीडित तरुणींनी कोथरूड पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना, पोलिसांनी साधी तक्रारही नोंदवून घेतली नाही. त्यामुळे पीडित तरुणींनी १२ तासांहून अधिक काळ पुणे पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन केले.
पोलिसांनी या आंदोलनाची दखल घेतली नाही. उलट दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यास नकार देत, ‘या प्रकरणी गुन्हा दाखल करता येणार नाही’ असे पत्र देत पीडितांनाच परत पाठवले. या धक्कादायक घटनेनंतर पुणे पोलिसांच्या भूमिकेवर जनमानसातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे की, “ज्या पोलिसांवर कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, तेच पोलीस जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण करत आहेत. आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्यावर कारवाई होत नाही, उलट ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत. हे पुण्यात पोलिसांचे जंगलराज आल्याचे स्पष्ट निदर्शक आहे.”
या घटनेने पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि नैतिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जनतेमध्ये कायद्याच्या राज्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
पुणे पोलिसांच्या ‘जंगलराज’वर काँग्रेसचा हल्लाबोल: ‘पीडितांवरच गुन्हा दाखल, हा तर ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचा प्रकार’
या घटनेने पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि नैतिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जनतेमध्ये कायद्याच्या राज्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.





पोलिसांनी या आंदोलनाची दखल घेतली नाही. उलट दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यास नकार देत, ‘या प्रकरणी गुन्हा दाखल करता येणार नाही’ असे पत्र देत पीडितांनाच परत पाठवले. या धक्कादायक घटनेनंतर पुणे पोलिसांच्या भूमिकेवर जनमानसातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या घटनेने पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि नैतिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जनतेमध्ये कायद्याच्या राज्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.