संगमनेर-
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहायक भास्कर खेमनर यांनी आमदार हल्ला प्रकरणातील त्यांचे नाव समोर आल्यानंतर एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले असून, हे थोरातांना बदनाम करण्यासाठी रचलेले राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.
नेमकं काय म्हटलंय निवेदनात?- खेमनर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आमदार हल्ला प्रकरणातील आरोपी प्रसाद गुंजाळ याने त्यांना २२ ते २५ तारखेदरम्यान एक-दोन वेळा फोन केला होता. ‘साहेब कुठे भेटतील?’ एवढीच विचारणा त्याने केली होती. या १५-२० सेकंदाच्या फोनव्यतिरिक्त आरोपीसोबत त्यांचे आजवर कोणतेही बोलणे झालेले नाही.
खेमनर पुढे म्हणतात की, त्यांना दररोज विविध कामांसाठी शेकडो फोन आणि मेसेजेस येत असतात. त्यामुळे अनेकदा ते मेसेजेस वाचूही शकत नाहीत. गुंजाळने त्यांना काही व्हॉट्सॲप मेसेजेस पाठवले होते, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. मात्र, त्या मेसेजेसमध्ये काय होते, हे त्यांना आजही माहीत नाही आणि त्यांनी कोणत्याही मेसेजला उत्तर दिलेले नाही. खेमनर यांनी आपण प्रसाद गुंजाळ नावाच्या या व्यक्तीला ओळखतही नसल्याचे म्हटले आहे.
राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप- या संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याचे कळाल्यानंतर खेमनर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, हे प्रकरण वैयक्तिक व्यवहाराचे असताना त्याला राजकीय स्वरूप दिले जात आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे सर्व षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
खेमनर यांनी पोलिसांना या प्रकरणाचा निःपक्षपाती तपास करण्याचे आवाहन केले आहे आणि आपण पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचेही सांगितले आहे. शेवटी, त्यांनी न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास व्यक्त केला असून जनता सुज्ञ असल्याचे म्हटले आहे.
आमदार हल्ला प्रकरणाशी संबंध नाही, हे थोरातांना बदनाम करण्यासाठीचे राजकीय षडयंत्र; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक भास्कर खेमनर यांचे निवेदन
ते म्हणाले की, हे प्रकरण वैयक्तिक व्यवहाराचे असताना त्याला राजकीय स्वरूप दिले जात आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे सर्व षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.





खेमनर पुढे म्हणतात की,
