देणग्यांची नाही, ही तर विश्वासाची लूट…
लेखक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक आहे.
ॲड. श्रीनिवास बिक्कड
अशा परिस्थितीत मंदिरासाठी भक्तांनी अर्पण केलेल्या देणग्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांनी, चांदीच्या विटा गायब झाल्याच्या दाव्यांनी, हिरे-दागिन्यांच्या नोंदींतील विसंगतींनी आणि निधीच्या वापरातील पारदर्शकतेवर उपस्थित झालेल्या प्रश्नांनी गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. कारण येथे केवळ पैशांचा हिशेब नाही, तर लाखो-कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धेचा आणि सार्वजनिक विश्वासाचा प्रश्न आहे.
राम मंदिरासाठी देशभरातून रोख रक्कम, सोने, चांदी, दागिने आणि विविध स्वरूपातील मौल्यवान वस्तू अर्पण करण्यात आल्या. अनेकांनी आयुष्यभराची बचत श्रद्धेने अर्पण केली. ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या गाठीशी असलेली रक्कम दिली. पण विश्वस्तांनी केलेल्या देणग्यांतील घोटाळ्यांमुळे भक्तांच्या विश्वासाला तडा गेला आहे.
पारदर्शक चौकशी करा