Author: अनंत पांगारकर

शनिवार, दि. २८ सप्टेंबर मेष – मेष राशीच्या लोकांना आज बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्हाला तुमच्या कामाचे नियोजन करावे लागेल. जर तुम्ही नवीन घर खरेदी करणार असाल तर तुम्हाला त्याच्या कागदपत्रांवर पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायात कोणतेही बदल करू नका, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. तुम्हाला देखावा करण्याच्या फंदात पडण्याची गरज नाही. वृषभ – वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस त्रासदायक असणार आहे. तुमचे काही काम अपूर्ण राहू शकतात, त्यामुळे तुमच्या मनात त्रास होईल. जर तुम्हाला कोणत्याही कामाबद्दल शंका असेल तर ते अजिबात करू नका. तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करावा लागेल कारण तुम्ही जे बोलता…

Read More

शुक्रवार, २६ सप्टेंबर आईच्या गैरहजेरीत स्वतःच्याच चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने बारा वर्षे सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात २९ सप्टेंबर २०२१ रोजी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नराधम बापाविरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी केला होता. या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली होती. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोप…

Read More

शिर्डीत महिला सशक्तीकरण कार्यक्रम अंतर्गत महिला मेळावा संपन्न शुक्रवार, २७ सप्टेंबर शिर्डी – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ९० लाख बहीणींच्या बँक खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित ६० लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल. एकाही भगिनींला दिवाळीत भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिर्डी येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला महामेळाव्याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला महसूल, पशूसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे, सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनीताई विखे,…

Read More

शुक्रवार, २७ सप्टेंबर मुंबई : काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून नासधूस करण्यात आली आहे. मंत्रालयातील कार्यालयात असणारी फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर लावलेली त्यांच्या नावाची पाटी महिलेने फेकून दिली आहे. कार्यालयाबाहेर असणाऱ्या कुंड्या देखील या अज्ञात महिलेने फेकल्या. हा सगळा गोंधळ घातल्यानंतर ही अज्ञात महिला त्यानंतर तिथून पसार झाली. मुंबई येथे मंत्रालयात महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सहाव्या मजल्यावर कार्यालय आहे. या कार्यालय बाहेर हा प्रकार घडला. दरम्यान, ही महिला कोण आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांकडून या महिलेचा शोध घेण्यात येत आहे. तसेच मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा…

Read More

शुक्रवार, २७ सप्टेंबर शेतजमीनीवर कर्ज काढण्यासाठी आवश्यक असलेल्या शेतजमीनीच्या नोंदी फेरफार करुन देण्यासाठी पंचासमक्ष लाचेची मागणी करुन दहा हजार रुपये लाच शासकीय कार्यालयात स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी लावलेल्या सापळ्यात वणीचे तलाठी शांताराम पोपट गांगुर्डे हे अडकले असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या मालकीची कसबे वणी, ता. दिंडोरी येथे गट क्रमांक ६१७ ही शेतजमीन असून त्यावर कर्ज काढावयाचे असल्याने कसबे वणी गावचे तलाठी शांताराम पोपट गांगुर्डे (रा. ध्रुवनगर, मोतीवाला मेडीकल कॉलेजसमोर रेणुका हाईट्स प्लॕट नंबर ९, सातपुर, नाशिक) यांची भेट घेऊन शेतगटाच्या नोंदी…

Read More

शुक्रवार, २७ सप्टेंबर पुणे : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून एका महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीवर चार जणांनी बलात्कार केला आहे. या प्रकरणात कोरेगाव पार्क पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन तरुण हे अल्पवयीन आहेत. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पीडित तरुणी ही कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दितील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. महाविद्यालयात सुरू असलेल्या “गुड टच बॅड टच” या उपक्रमातून ही घटना समोर आली. हा सगळा प्रकार एप्रिलपासून सुरू होता. पीडित तरुणी…

Read More

शुक्रवार, २४ सप्टेंबर मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी कीर्ती आणि वैभव वाढवणारा आहे. आपण बऱ्याच काळापासून कोणत्याही व्यावसायिक कराराबद्दल चिंतित असल्यास, ते आज पूर्ण होऊ शकते. तुम्हाला तुमचे कोणतेही काम उद्यापर्यंत पुढे ढकलणे टाळावे लागेल. तुम्हाला शारीरिक त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वाहने जपून वापरावी लागतील.वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाणार आहे. प्रेम जीवन जगणारे लोक त्यांच्या जोडीदारासोबत रोमँटिक मूडमध्ये असतील आणि त्यांना बाहेर फिरायला घेऊन जातील. आईसोबत काही वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विचारपूर्वक बोला. कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या विचारांचे स्वागत होईल. मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल. नवीन पद मिळाल्यास तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. तुम्ही…

Read More

गुरुवार, २६ सप्टेंबर  राहाता – माझ्यावर समन्यायीचा आरोप करणारे तेव्हा कुठे होते? मंत्रिमंडळात तुम्हीही होता मग का नाही बोललात? संगमनेरमधून आम्ही भूमिका घेत समन्यायीबद्दल विरोध दर्शविला. महसूलमंत्री असताना आम्ही खोट्या केसेस करून लोकांना जेलमध्ये टाकले नाही. असं स्पष्ट करत गणेश कारखान्यात इतिहास का घडला हे विसरू नका, कारण जर आपण ते विसरलो तर पुन्हा सगळं जैसे थे होईल अशी टीका माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर केली. गणेश सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यस्थळावर पार पडली. यावेळी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात बोलत होते. व्यासपीठावर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवानेते विवेक कोल्हे, कृषी भूषण…

Read More

शेतकऱ्याकडे मागितले दीड हजार रुपये  कृषी अधिकाऱ्यांच्या पत्राची कंपनीने दखल घेत पैसे मागणाऱ्या प्रतिनिधीवर केली कारवाई  गुरुवार, २६ सप्टेंबर  पिक विमा असल्याने शेतातील पिकाचा पंचनामा करण्यासाठी संबंधित इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधीने शेतकऱ्याकडे दीड हजार रुपयांची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार संगमनेरमधून समोर आला आहे. या संदर्भात शेतकऱ्याने कृषी विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर कृषी विभागाच्या पत्राची दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील शेतकरी विश्वास दातीर यांनी इन्शुरन्स कंपनीकडे खरीप हंगाम २०२४-२५ अंतर्गत पिक विमा काढला होता. पिक विम्यास पात्र असल्याने त्यांनी संबंधित कंपनीकडे ऑनलाइन तक्रार केली होती. त्यानंतर संबंधित कंपनीने आपला प्रतिनिधी पिकाच्या पंचनाम्यासाठी…

Read More

गुरुवार, २६ सप्टेंबर “पंतप्रधान गणपतीचे मोदक खायला सरन्यायाधीशांकडे जातात. मग भ्रष्टाचाऱ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या आमच्या सारख्या लोकांना न्याय कसा मिळेल? हे अपेक्षितच होतं. अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं होतं की न्यायव्यवस्था कोणाची तरी रखेल झाली आहे, हे स्पष्ट दिसतंय. आम्ही त्या कोर्टाचा आदर करतो, आम्ही नक्की वरच्या कोर्टात जाऊ”, असे सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि न्यायव्यवस्थेवर टीका केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर मेधा सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. या प्रकरणात माझगाव कोर्टाने त्यांना दोषी ठरवले असून त्यांना १५ दिवसांची शिक्षा सुनावली आहे. तर, त्यांना न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून ही रक्कम मेधा यांना…

Read More