संगमनेर, महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गरजू आणि योग्य लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी अपात्र शिधापत्रिकाधारक आणि उच्च गटातील लाभार्थ्यांनी अन्नधान्य योजनेतून बाहेर पडण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे, या योजनेतून मुदतीत बाहेर न पडल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे म्हटले आहे. गरजू आणि योग्य लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी “राज्य सरकारने अन्नधान्याच्या योजनेतून बाहेर पडा” ही योजना एका शासन निर्णयाच्या आधारे सुरु केली आहे. अपात्र रेशनकार्डधारक, उच्च गटातील लाभार्थ्यांनी बाहेर पडणे आवश्यक आहे. असे लाभार्थी मुदतीत बाहेर पडले नाही तर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. शहरी भागासाठी ५९०००/- रुपये आणि…
Read More