शासनाला अन्नदात्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायला भाग पाडू: अमर कतारी
नाफेड मार्फत कांदा खरेदीसाठी अटी शर्ती शिथिल करा: भाऊसाहेब हासे
महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संगमनेर शिवसेना (ठाकरे) आक्रमक झाली आहे. पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यात शेतीचे प्रश्न गंभीर बनले त्यामुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची व टंचाईग्रस्त गावांना तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
अशी आहे स्थिती: संगमनेर तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने बाजरी, सोयाबीन, मका, कापूस, भुईमूग ही पिके पूर्णपणे जळाली असून जनावरांचा चारासुद्धा खाण्यायोग्य राहिला नाही. तालुक्यात पाण्याची देखील टंचाई निर्माण झाली असून टंचाईग्रस्त गावांना तातडीने टँकरने पाणी उपलब्ध करून द्यावे. राज्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चारा छावण्या सुरू करता येणार नसल्याने सरकारने प्रत्येक गावात तात्काळ जारा उपलब्ध करून द्यावा. नाफेडच्या जाचक अटी शर्ती रद्द करून कांद्याची खरेदी केली जावी.
निवेदनाद्वारे केली ही मागणी: दुष्काळाशी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची राज्य सरकारने तात्काळ दाखल घेत भरीव मदत करावी. संगमनेर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशा आशयाचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तालुक्यातील शिवसैनिक शेतकऱ्यांच्या प्रश्न सोबत असून प्रशासनाने त्यांना न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
उपस्थिती: शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देतेवेळी युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, महिला आघाडी तालुकाप्रमुख शितल हासे, युवासेना शहरप्रमुख गोविंद नागरे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश खेमनर, युवासेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख परवेज शेख, विभाग प्रमुख विजय भागवत, शहर संघटक दीपक साळुंखे, शिवसेना तालुका सचिव संदीप राहणे, सचिव कचरू वारुंगशे, उपतालुकाप्रमुख शरद कवडे, युवासेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, उपशहर प्रमुख वेणुगोपाल लाहोटी, इम्तियाज शेख, दीपक वन्नम, शाखाप्रमुख प्रकाश चोथवे, रहीम बेग, ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख सदाशिव हासे, विधानसभा प्रमुख रंगनाथ फटांगरे, ब्रह्मा खिडके, प्रशांत खजुरे, त्रिलोक कतारी व शिवसैनिक तसेच शेतकरी उपस्थित होते.

