महाराष्ट्र संवाद न्यूज
अयोध्या : एक काळ असा होता की राम लल्ला तंबूत होते, आता फक्त रामलल्लालाच नाही तर देशातील चार कोटी गरीब जनतेलाही कायमस्वरूपी घर मिळाले आहे. ‘देशाच्या इतिहासात ३० डिसेंबर ही तारीख अत्यंत ऐतिहासिक ठरली आहे. या दिवशी १९४३ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमध्ये ध्वजारोहण करून भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती. आज स्वातंत्र्य चळवळीशी निगडित अशा एका शुभदिनी आपण स्वातंत्र्याच्या अमर युगाचा संकल्प पुढे नेत आहोत. विकसित भारताच्या उभारणीला गती देण्याच्या मोहिमेला आज अयोध्या नगरीतून नवी ऊर्जा मिळत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचे उद्घाटन केले तसेच १५,७०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यादरम्यान त्यांनी एका कार्यक्रमाला संबोधित केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘अयोध्या धाम विमानतळाचे नामकरण त्रिकालदर्शी महर्षी वाल्मिकी यांच्या नावाने करण्यात आले. या विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला ते आशीर्वाद देतील. महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेले रामायण ज्ञानाचा मार्ग आहे. जे आपल्याला भगवान श्रीरामाशी जोडते. आधुनिक भारतात, महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या धाम, आपल्याला दिव्य-भव्य-नवीन राम मंदिराशी जोडेल.
या पायाभूत सुविधांशी संबंधित कामांमुळे पुन्हा एकदा देशाच्या नकाशावर आधुनिक अयोध्या अभिमानाने प्रस्थापित होईल. जगात कोणताही देश असो, त्याला विकासाची नवी उंची गाठायची असेल तर त्याचा वारसा जपला पाहिजे. आपला वारसा आपल्याला प्रेरणा देतो, आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. त्यामुळे आजचा भारत जुना आणि नवा या दोन्ही गोष्टी आत्मसात करून पुढे जात आहे.
‘आज संपूर्ण जग २२ जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशा स्थितीत अयोध्येतील जनतेमध्ये कमालीचा उत्साह असणे स्वाभाविक आहे. मी भारताच्या मातीच्या प्रत्येक कणाचा आणि भारतातील प्रत्येक माणसाचा पूजक आहे. मीही तुमच्यासारखाच उत्सुक आहे. आम्हा सर्वांचा हा जल्लोष आणि उत्साह अयोध्येच्या रस्त्यावर पूर्णपणे दिसत होता. जणू काही अयोध्या नगरी रस्त्यावर आली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘२२ जानेवारी रोजी प्रभू श्री राम त्यांच्या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चरणकमळांसह विराजमान होणार आहेत. ५०० वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे. प्रभूच्या आगमनापूर्वी पंतप्रधानांनी अयोध्येला जगातील सर्वात सुंदर शहर म्हणून प्रस्थापित करण्याचा संकल्प केला होता, आज अयोध्येतील जनतेने ज्या भव्यतेने पंतप्रधानांचे स्वागत केले आहे, त्यामुळे आपल्या सर्वांना नव्या भारताची नवी अयोध्या पाहायला मिळते.
#WATCH | Ayodhya, Uttar Pradesh: PM Narendra Modi says, "I have a request to all. Everyone has a wish to come to Ayodhya to be a part of the event on 22 January. But you know it is not possible for everyone to come. Therefore, I request all Ram devotees that once the formal… pic.twitter.com/pbL81WrsbZ
— ANI (@ANI) December 30, 2023

