महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी लिहिलेल्या व स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणाऱ्या “मध्ययुगीन भारताचा इतिहास” या पुस्तकाचे रविवारी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे.
नामवंत व्याख्याते, विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिरात रविवारी (ता. २८) सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होत असल्याची माहिती देण्यात आली.
नागणे यांनी लिहिलेले हे पुस्तक स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे आहे. नागणे हे संगमनेर पंचायत समितीमध्ये गेल्या काही वर्षांपासून गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणे, मुलाखतीची तयारी व अभ्यासाची पद्धती या संदर्भात सातत्याने ते मार्गदर्शन करत आले आहेत.
त्यांचे नव्याने येत असलेले हे पुस्तक स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना निश्चित भावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन चाणक्य परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.



