दि. १६ मार्च, नवी दिल्ली
यंदाची १८ वी लोकसभा निवडणूक देशभरात १९ एप्रिल ते २ या कालावधीत सात टप्प्यात घेतली जाणार असून ४ जूनला देशातील सर्वात मोठ्या निवडणुकीची मतमोजणी होणार असून देश कोणाच्या हाती जाणार हे स्पष्ट होणार असून राज्यात ५ टप्प्यात निवडणूक होणार आहे. याशिवाय सिक्कीम, अरुणाचल आणि आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचीही घोषणा केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषदेत केली आहे. करण्यात आले आहे.
मोदी सरकारचा कार्यकाळ येत्या ६ सहा जूनला संपुष्टात येत असून निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी देशभरातील ५४३ जागांवर १९ एप्रिल पासून मतदानाला सुरुवात होणार असून ७ टप्प्यामध्ये निवडणूक घेण्यात येणार असल्याचे सांगत देशभरात या निवडणुकीसाठी ९७ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. देशभरात १०.५० लाखाहून अधिक मतदार केंद्र असतील. निवडणुकीसाठी ५५ लाख इव्हीएम मशीन वापरण्यात येणार असून १ कोटी ८२ लाख नवीन मतदारांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे व २० मे या पाच टप्प्यात होणार आहे. यावेळी नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक १३ मे या एकाच दिवशी होणार असल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची मोठी दमछाक होणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात कधी होणार मतदान…
पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला – गडचिरोली, भंडारा-गोंदिया, नागपूर, चंद्रपूर व रामटेक या पाच लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडेल.
दुसरा टप्प्यात २६ एप्रिलला – बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, नांदेड, हिंगोली व परभणी या आठ मतदारसंघात मतदान पार पडेल.
तिसरा टप्प्यात ७ मे रोजी – रायगड, बारामती, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, माढा, सातारा, सांगली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर व हातकणंगले या अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडेल.
चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी – नंदुरबार, रावेर, जळगाव, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, बीड, शिरूर, शिर्डी व अहमदनगर या अकरा लोकसभा मतदान पार पडेल.
पाचव्या टप्प्यात २० मे रोजी – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे व मुंबईच्या सहा लोकसभा मतदार संघात मतदान पार पडणार आहे. त्यानंतर देशभरातील सर्व ठिकाणचे एकत्रित मतमोजणी ४ चार जूनला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

