शुक्रवार, दिनांक ७ जून २०२४
लोकसभा निवडणुकीनंतर देशात नवे सरकार सत्तारूढ होत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशभरात लावण्यात आलेली आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने कळविल्याची माहिती राज्य निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
राज्यातील आचारसंहिता संपुष्टात आली असली तरी नाशिक, मुंबई आणि कोकण विभागातील आदर्श आचारसंहिता सुरूच राहणार असल्याची माहिती देखील निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
येत्या २६ जूनला मुंबई विभाग पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, मुंबई विभाग शिक्षक आणि नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने ही आचारसंहिता सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


