संगमनेरच्या फाळणीचा डाव वरपर्यंत पोहोचला सुद्धा… माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी थेट तहसीलदारांच्या सहीचे पत्रच दाखविले
उघडा डोळे जागे व्हा, संगमनेर वाचवा... ही फक्त सुरुवात आहे. आज आपण शांत बसलो तर ते संगमनेर तोडण्याचा कुटील डाव साधतील.
संगमनेर दि. ३०-
याच पार्श्वभूमीवर गुरुवारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत संगमनेरच्या फाळणीचा प्रस्ताव हा फक्त तहसील कार्यालयापुरता मर्यादित राहिलेला नाही, आता हा प्रस्ताव थेट जिल्हाधिकारी, आयुक्त कार्यालय ते मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचे पुरावे बाळासाहेब थोरात यांनी दाखविले. थोरात यांनी संबंधितांच्या सहीचेच प्रस्ताव दाखविल्याने या प्रकरणातील वस्तुस्थिती देखील समोर आली आहे.
अवघ्या चार ते पाच दिवसात संगमनेर तोडण्याचा कुटील डाव काही मंडळींनी साधलेला दिसतोय, अशा प्रतिक्रिया देखील आता समोर येऊ लागल्या आहे.
प्रस्ताव व्हायरल होताच असं काही नसल्याचा दावा… आश्वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालय निर्मितीचा प्रस्ताव अंगलट आल्यानंतर काही राजकीय पक्षांचे बगलबच्चे थयथयाट करायला लागले होते. असा प्रस्ताव तयार झालाच नाही, ही माहिती खोटी आहे, असाही अपप्रचार त्यांनी सुरू केला होता.
असा झाला प्रस्तावाचा प्रवास… काही मंडळींनी तर तहसीलदारांची सही नाही, आवक-जावक क्रमांक नाही असेही अकलेचे तारे तोडले. त्या मंडळींच्या माहितीसाठी २४ जानेवारी २०२५ रोजीच सदर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला तर २७ जानेवारीला त्यांच्याकडून तो आयुक्तांकडेही दाखल करण्यात आला आहे.
तर ते संगमनेर तोडण्याचा डाव साधतील… उघडा डोळे जागे व्हा, संगमनेर वाचवा… ही फक्त सुरुवात आहे. आज आपण शांत बसलो तर ते संगमनेर तोडण्याचा कुटील डाव साधतील. असं देखील म्हणत प्रस्तावासह थोरात यांची छायाचित्रे आणि यासंबंधीचा मेसेज समाज माध्यमात व्हायरल होत आहे.
