संगमनेर, दि. १९ फेब्रुवारी –
लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली वैभवशाली ठरलेल्या संगमनेर संगमनेर शहरात येणाऱ्या वर्षाच्या आतच प्रत्येकाची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बस स्थानकासमोर उभा करून पुढील वर्षीची जयंती येथे साजरी करू असा विश्वास नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला.
बुधवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर तांबे बोलत होते. यावेळी सोमेश्वर दिवटे, किशोर पवार, सतीश आहेर, अंबादास आडेप आदीसह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
तांबे म्हणाले, लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये बस स्थानकासमोर भव्य अश्वारूढ पुतळा वर्षभराच्या आतच उभा राहणार आहे. या पुतळ्यासाठी नगरपरिषदेने ३ जून २०१९ रोजी झालेल्या वार्षिक सभेत ठराव करत शासनाकडे जागा मागितली होती. यासाठी पाठपुरावा करत आपण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अश्वारूढ पुतळ्यासाठी संगमनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा जवळील जागा २१ ऑगस्ट २०२३ रोजी हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. या मागणीला तात्काळ मंजुरी मिळाली.
त्यामुळे पुतळ्यासाठी बस स्थानकासमोर जागा निश्चित करण्यात आले असून एक कोटी रुपयांचे निधीतून येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा तयार केला जाणार असून पुतळ्याचा परिसर देखील सुशोभित करण्यात येणार आहे. या कामासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर करून घेऊ किंवा नगरपालिकेच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी उभा करून या ठिकाणी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला जाईल.
याशिवाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील पूर्णाकृती पुतळा उभा केला जाणार असून, स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ भव्य शहीद स्मारक उभे केले जाणार आहे. याचबरोबर तसं सांगता समोर दर्शनी जागेवर भव्य शंभर फुटी तिरंगा उभा केला जाणार असल्याचे तांबे यांनी म्हटले आहे.
छावा चित्रपट करमुक्त करा… हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाचा आणि शौर्याचा ज्वलंत इतिहास सांगणारा छावा हा चित्रपट राज्य सरकारने करमुक्त करावा अशी मागणी सरकारकडे केले असल्याचे स्पष्ट करा त्याबाबत सकारात्मक निर्णय होऊन लवकरच हा चित्रपट करमुक्त होईल अशी अपेक्षा तांबे यांनी व्यक्त केली.


जयंती उत्सवात राजकारण दुर्दैवी…