Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

28/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”
राजकारण

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

शहराच्या विकासाशी थेट संबंधित असणारे नगरविकासासारखे अत्यंत महत्त्वाचे खाते आणि त्यासोबत परिवहन खाते हातात असताना, स्मारकासाठी आवश्यक वाढीव जागेचा विषय शासनस्तरावर सोडवण्यासाठी पुरेसा कालावधी आणि संधी उपलब्ध होती. तरीही हा प्रश्न प्रलंबित राहिला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/08/2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर : 

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हा संगमनेर शहरासाठी केवळ एक विकास प्रकल्प नसून, तो प्रत्येक संगमनेरकराच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे. त्यामुळे संगमनेरकरांच्या मनात ज्या स्वरूपाचे स्मारक आहे, त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत, त्याला पूर्णपणे न्याय देणारे भव्य-दिव्य, दिमाखदार आणि पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे स्मारकच उभारण्यात येईल. स्मारकाच्या उभारणीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि त्यासाठी नगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी स्पष्ट भूमिका माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक दिलीप पुंड यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना दिलेला स्वाभिमान, लोककल्याणकारी राज्यकारभार, सर्वधर्मसमभाव, दूरदृष्टी आणि रयतेप्रती असलेली बांधिलकी आजही प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये उभारण्यात येणारे महाराजांचे स्मारक हे केवळ पुतळा किंवा वास्तू म्हणून मर्यादित न राहता, महाराजांच्या कर्तृत्वाची आणि विचारांची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणारे केंद्र असावे, अशी संगमनेरकरांची भावना आहे. ही भावना लक्षात घेऊनच नगरपालिकेकडून स्मारकाचे नियोजन करण्यात येत आहे.

स्मारकासाठी आवश्यक असलेल्या वाढीव जागेचा प्रश्न गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र या दीड वर्षांच्या काळात परिवहन तसेच नगरविकास खाते आपल्याच ताब्यात असतानाही संबंधितांकडून हा प्रश्न मार्गी का लावण्यात आला नाही, असा सवाल दिलीप पुंड यांनी उपस्थित केला. शहराच्या विकासाशी थेट संबंधित असणारे नगरविकासासारखे अत्यंत महत्त्वाचे खाते आणि त्यासोबत परिवहन खाते हातात असताना, स्मारकासाठी आवश्यक वाढीव जागेचा विषय शासनस्तरावर सोडवण्यासाठी पुरेसा कालावधी आणि संधी उपलब्ध होती. तरीही हा प्रश्न प्रलंबित राहिला, याचे उत्तर आधी संगमनेरकरांना दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या दीड वर्षात वाढीव जागेसाठी ठोस निर्णय घेता आला नाही आणि आता नगरपालिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे प्रत्यक्ष काम पुढे नेण्याचा प्रयत्न करत असताना त्यावर आक्षेप उपस्थित करणे, हा मोठा विरोधाभास आहे. स्मारकाच्या कामाला गती मिळत असताना त्यामध्ये अडथळे निर्माण करण्यापेक्षा किंवा नागरिकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करण्यापेक्षा, स्मारक अधिक भव्य आणि सुंदर कसे होईल यासाठी सर्वांनी एकत्रितपणे सहकार्य करणे आवश्यक आहे, असे पुंड यांनी स्पष्ट केले.

आमदार सत्यजीत तांबे यांनी यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी स्पष्ट भूमिका घेतली असून, स्मारकाच्या उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. संगमनेरकरांच्या भावनांना न्याय देणारे आणि शहराच्या वैभवात भर घालणारे स्मारक उभारले जावे, यासाठी आवश्यक त्या स्तरावर प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यानंतर नगरपालिकेनेही स्मारकाच्या प्रत्यक्ष उभारणीच्या दृष्टीने आवश्यक नियोजनाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या विषयाला राजकीय वादाचे स्वरूप न देता प्रत्यक्ष कामाला गती मिळणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे.

स्मारकाचे नियोजन करताना केवळ आजचा विचार केला जाणार नाही, तर पुढील अनेक दशकांचा आणि शहराच्या वाढत्या विस्ताराचाही विचार केला जाणार आहे. स्मारकाचा परिसर प्रशस्त, आकर्षक आणि नागरिकांसह शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठीही प्रेरणादायी ठरावा, यासाठी नियोजन केले जाईल. महाराजांच्या स्मारकाची भव्यता, परिसराचे सुशोभीकरण, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा, वाहतुकीचे नियोजन तसेच भविष्यातील गरजा या सर्व बाबींचा एकत्रित विचार करण्याची नगरपालिकेची भूमिका आहे.

वाढीव जागा अधिकृतपणे उपलब्ध झालीच पाहिजे –

अतिरिक्त जागेचा उपयोग स्मारक अधिक भव्य करण्यासाठी, परिसर अधिक प्रशस्त करण्यासाठी तसेच सुशोभीकरण आणि अन्य आवश्यक सुविधांसाठी नियोजनबद्ध पद्धतीने केला जाईल. त्यामुळे वाढीव जागा नगरपालिकेला मिळावीच व ती जागा उपलब्ध करून देण्यासाठी ज्यांच्याकडे संबंधित खाती आणि अधिकार आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा. मात्र वाढीव जागेचा विषय पुढे करून सध्या सुरू असलेल्या स्मारकाच्या प्रक्रियेला थांबवण्याचा किंवा त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न योग्य ठरणार नाही, असेही पुंड यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करण्याऐवजी त्यांच्या स्मारकासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. दीड वर्षे संधी आणि संबंधित खाती हातात असताना वाढीव जागेचा प्रश्न सोडवला गेला नाही आणि आता नगरपालिका प्रत्यक्ष कामाला लागल्यानंतर त्याच मुद्द्यावरून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर संगमनेरकर ते स्वीकारणार नाहीत. संगमनेरची जनता सुज्ञ असून, कोण स्मारकाचे काम पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि कोण त्यामध्ये अडथळे निर्माण करत आहे, हे नागरिकांना चांगले समजते, असे पुंड म्हणाले.

या विषयामध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अधिक भव्य, आकर्षक आणि प्रेरणादायी कसे करता येईल, यासाठी प्रत्येकाने आपापल्या स्तरावर योगदान देणे गरजेचे आहे. वाढीव जागा मिळवून देणे शक्य असेल तर त्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करावेत. नगरपालिकाही त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करेल. मात्र जागेच्या नावाखाली स्मारकाचे प्रत्यक्ष काम रखडता कामा नये, अशी स्पष्ट भूमिका नगरपालिकेची आहे.

संगमनेर शहराच्या मध्यवर्ती ओळखीचा आणि अभिमानाचा भाग म्हणून हे स्मारक विकसित करण्याचा मानस आहे. भविष्यात संगमनेरमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या स्मारकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची जाणीव व्हावी आणि प्रत्येक संगमनेरकराला या स्मारकाकडे पाहताना अभिमान वाटावा, या दृष्टीने त्याची उभारणी केली जाईल. स्मारक हे शहराच्या सौंदर्यात भर घालणारे तर असेलच, परंतु नव्या पिढीला महाराजांचा इतिहास, त्यांचे विचार आणि आदर्श यांची प्रेरणा देणारेही ठरेल.

“छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा पक्षाचा विषय नाही; हा संपूर्ण संगमनेरचा विषय आहे. त्यामुळे त्यात राजकारण न आणता संगमनेरकरांच्या अपेक्षेप्रमाणे सर्वांनी मिळून भव्य-दिव्य स्मारक उभारण्यासाठी योगदान द्यावे. नगरपालिका या कामात कोणतीही कमतरता ठेवणार नाही. वाढीव जागा उपलब्ध झाली तर तिचाही योग्य वापर केला जाईल आणि संगमनेरकरांच्या मनातील स्मारकच प्रत्यक्षात साकारले जाईल,” असा विश्वास पुंड यांनी व्यक्त केला.

संगमनेरकरांच्या भावना, शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक लौकिक तसेच पुढील पिढ्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे हे स्मारक संगमनेरची नवी ओळख आणि प्रत्येक संगमनेरकराचा अभिमान ठरेल, अशाच भव्य स्वरूपात उभारण्यासाठी नगरपालिका पूर्ण क्षमतेने काम करणार असल्याचेही पुंड यांनी स्पष्ट केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 262
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा दिलीप पुंड
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

By Annant Ppangarkar28/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर :  छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हा संगमनेर शहरासाठी…

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

28/08/2026

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.