Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

24/08/2026

शिव्यांची नव्हे तर ओव्यांची संगत धरा; ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांचे प्रतिपादन

24/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’
राजकारण

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

पुणे-नाशिक सरळ रेल्वे सेवा सुरू झाल्यास या तरुणांना वेळेत घरी पोहोचून आईच्या हातचे जेवणही करता येईल, अशी भावना मांडत रेल्वेचा प्रश्न केवळ प्रवासापुरता मर्यादित नसल्याचे अधोरेखित केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
मुंबई:
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जागतिक वडापाव दिनानिमित्त सोशल मीडियावर वडापावसोबत लसूण चटणी की तळलेली मिरची, असा प्रश्न विचारत पोस्ट केली. या पोस्टला प्रतिक्रिया देताना आमदार सत्यजीत तांबे यांनी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मुद्दा पुन्हा एकदा मांडला.
‘लसूण चटणी किंवा तळलेली मिरची? दोन्हीपैकी काहीही चालेल. फक्त पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेत हा वडापाव खाण्याची संधी मिळाली पाहिजे. यासाठीच आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत,’ अशी प्रतिक्रिया तांबे यांनी दिली. मात्र, या प्रतिक्रियेतून त्यांनी या रेल्वे मार्गाशी जोडलेल्या सर्वसामान्यांच्या भावना प्रभावीपणे मांडल्या.
काहींसाठी वडापाव ही मौजमजा असेल पण, रेल्वेच्या अभावामुळे घरापासून लांब राहणाऱ्या तरूणांसाठी हीच उपजीविका आहे. त्यामुळे पुणे-नाशिक सरळ रेल्वे सेवा सुरू झाल्यास या तरुणांना वेळेत घरी पोहोचून आईच्या हातचे जेवणही करता येईल, अशी भावना मांडत रेल्वेचा प्रश्न केवळ प्रवासापुरता मर्यादित नसल्याचे अधोरेखित केले.
संगमनेरमार्गे रेल्वेसाठी सातत्याने पाठपुरावा
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेरमार्गे व्हावी, यासाठी गेल्या काही काळापासून विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे यांच्यासह नागरिक आणि विविध लोकप्रतिनिधींकडून या मार्गासाठी भूमिका मांडली जात आहे. या मागणीसाठी नुकतेच ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी नाशिक, संगमनेर, जुन्नर आणि शिरूर येथे जनआंदोलनही झाले. या आंदोलनांमध्ये विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि नागरिक सहभागी झाले होते.
विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा रेल्वे मार्ग
पुणे-नाशिक थेट रेल्वे सेवा सुरू झाल्यास नाशिक, संगमनेर, जुन्नर, आंबेगाव, मंचर, खेड, चाकण आणि पुणे या भागांतील प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होऊ शकते. शिक्षण, रोजगार, उद्योग, व्यापार आणि पर्यटनासाठी या मार्गाचा मोठा उपयोग होईल, अशी भूमिका या मागणीच्या पाठपुराव्यातून मांडली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे संगमनेरमार्गे मार्गाचा विचार व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
रेल्वेमंत्र्यांच्या वडापाववरील पोस्टला उत्तर देताना आमदार तांबे यांनी कोणतीही राजकीय टीका न करता आपल्या मतदारसंघातील आणि या भागातील नागरिकांची अपेक्षा एका साध्या आणि भावनिक पद्धतीने मांडली. वडापावच्या निमित्ताने सुरू झालेली ही चर्चा थेट घरच्या जेवणापर्यंत पोहोचली आणि त्यामुळे पुणे-नाशिक रेल्वेचा मुद्दा पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 241
अश्विनी वैष्णव नाशिक पुणे रेल्वे सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

24/08/2026

कौठेमलकापूर सौरऊर्जा प्रकल्पाला स्थगिती; औद्योगिक वसाहतीचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; आमदार अमोल खताळ यांच्या मागणीला यश

23/08/2026

निझर्णेश्वर मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा करणार: आमदार अमोल खताळ

17/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

By Annant Ppangarkar24/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जागतिक वडापाव दिनानिमित्त…

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

24/08/2026

शिव्यांची नव्हे तर ओव्यांची संगत धरा; ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांचे प्रतिपादन

24/08/2026

पत्रकारावर हल्ला करून फरार झालेले तीन आरोपी छत्रपती संभाजीनगरमधून जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

24/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.