संगमनेर –
संगमनेर तालुक्यातील चिखली गावाच्या ग्रामपंचायतीने निळवंडे धरणातून संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईप लाईनवरून दडपशाहीने टाकण्यात येत असलेल्या 33 केव्ही उच्चदाब ओव्हरहेड वीज वाहिनीला तीव्र विरोध दर्शवला आहे. ग्रामस्थांनी ग्रामसभेत या संदर्भात केलेल्या ठरावानंतर ग्रामपंचायतीने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून ही वीज वाहिनी तातडीने हटवण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
‘श्रमिक मिल्क अँड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री’ या कंपनीने 7 मे 2024 रोजी चिखली सबस्टेशन ते वाडापूर आणि मेमाणे वस्तीपर्यंत वीज वाहिनी टाकण्यासाठी ग्रामपंचायतीकडे NOC (ना हरकत प्रमाणपत्र) मागितले होते. मात्र, 30 मे 2024 रोजी झालेल्या मासिक सभेत, ग्रामपंचायतीने ‘चिखली सबस्टेशन ते वाडापूर ते संगमनेर-अकोले रोड’ अशी चुकीची NOC दिली. ही चूक लक्षात आल्यावर, 28 मे 2025 रोजीच्या ग्रामसभेत ठराव क्र. 8(3) आणि 8(4) नुसार ही NOC रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात ग्रामस्थांनी संबंधित कंपनी आणि ठेकेदारांनी ग्रामपंचायतीने चुकीने दिलेली NOC (ना हरकत प्रमाणपत्र) रद्द झालेली असतानाही हे काम बेकायदेशीरपणे सुरू ठेवले आहे. पोलिसांनी केलेल्या दडपशाहीमुळे हे काम चुकीच्या मार्गाने केले जात असल्याचा आरोप त्यांनी या पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे केला आहे.
या वीज वाहिनीमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामांची कल्पना या पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे. चिखली गावाजवळून जाणारी ही 33 केव्ही वीज वाहिनी निळवंडे धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवरून टाकण्यात येत आहे. ग्रामस्थांनी पत्रात म्हटले आहे की, जर कोणत्याही कारणाने ही वीज वाहिनी तुटून पाईपलाईनवर पडली, तर मोठा अपघात होऊ शकतो. यामुळे संगमनेर शहर, अकोले शहर आणि परिसरातील अनेक लोकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होईल.
ही वीज वाहिनी केवळ पाईप लाईनवरच नाही, तर स्मशानभूमी, मंदिरे, दुकाने, लोकांची घरे आणि वर्दळीच्या संगमनेर-अकोले रस्त्यालगतही टाकली जात आहे. यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही पोल थेट रस्त्याच्या कडेला उभे असल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
केवळ चिखलीच नाही, तर संगमनेर नगर परिषद, गुंजाळवाडी, राजापूर, आणि धांदरफळ बुद्रुक या परिसरातील ग्रामपंचायतींनीही ठराव मंजूर करून या प्रकल्पाला विरोध केला आहे. मात्र, अद्याप कोणत्याही संबंधित अधिकाऱ्याने याची दखल घेतलेली नसल्याचे या पत्रात म्हटले आहे.
26 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत, ग्रामस्थांनी सर्वानुमते यासंबंधीचा ठराव केला आहे. ठरावात म्हटले आहे की, स्मशानभूमी, वस्तीजवळचे आणि संगमनेर-अकोले रस्त्यालगतचे सर्व पोल 15 दिवसांच्या आत काढून घ्यावेत. जर यावर कार्यवाही झाली नाही, तर महावितरण कंपनीच्या संगमनेर कार्यालयावर आंदोलन, मोर्चा आणि उपोषण करण्याचाही इशारा दिला आहे. यानंतर होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस संबंधित जबाबदार असतील, असे देखील या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान एका उद्योगपतीसाठी अनेकांचा मोठा विरोध झूगारून सुरू असलेल्या या कामाविरोधात राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
निळवंडेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला धोका निर्माण करणाऱ्या 33 केव्ही वीज वाहिनीला चिखली ग्रामस्थांचा तीव्र विरोध, ग्रामपंचायतने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत दिला आंदोलनाचा इशारा; श्रमिक मिल्क अँड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री’प्रश्नी मुख्यमंत्री लक्ष घालणार का?
दरम्यान एका उद्योगपतीसाठी अनेकांचा मोठा विरोध झूगारून सुरू असलेल्या या कामाविरोधात राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.





मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात ग्रामस्थांनी संबंधित कंपनी आणि ठेकेदारांनी
दरम्यान एका उद्योगपतीसाठी अनेकांचा मोठा विरोध