ऑपरेशन टायगर हा महाराष्ट्रातील राजकारणाच्या इतिहासातला काळा दिवस – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा संताप
एका बाजूला प्रचंड आर्थिक राजकारण आणि दुसऱ्या बाजूला 'ईडी'ची भीती, या दुहेरी कचाट्यात सध्या राजकारण करणे कठीण झाले आहे.

भाजपवर विरोधी पक्ष फोडण्याचा आरोप करताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “लोटस, टायगर, लायन… मला त्या जनावरांची नावे माहिती नाहीत; पण शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षात विभाजन झाल्याच्या बातम्या येत आहेत. शिवसेनेच्या नऊपैकी सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिले आहे. त्यामुळे पक्षात फूट पडलेली स्पष्ट दिसत आहे.
एका बाजूला प्रचंड आर्थिक राजकारण आणि दुसऱ्या बाजूला ‘ईडी’ची भीती, या दुहेरी कचाट्यात सध्या राजकारण करणे कठीण झाले आहे. तुम्ही पक्षात आलात तर ‘खोके’ मिळतील, कंत्राटे मिळतील आणि त्यातून चाळीस टक्के कमिशन खा, असे भ्रष्ट राजकारण सुरू आहे. नरेंद्र मोदी सरकारचे एकमेव उद्दिष्ट सत्ता मिळवणे हेच आहे. आपण सुवर्ण महोत्सव, रौप्य महोत्सव, अमृत महोत्सव ऐकतो; पण मोदींचा हा १२ वर्षांचा उत्सव नेमका कशासाठी?” असा सवाल चव्हाण यांनी केला. तसेच देशाची अर्थव्यवस्था घसरत चालली असून महागाई प्रचंड वाढल्याचा आरोपही माजी मुख्यमंत्र्यांनी केला.
