

घोटी: महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाई शिखरावर नवरात्रीच्या पावन पर्वात भक्ती, श्रद्धा आणि साहसाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक गेली २९ वर्षांपासून एक आगळीवेगळी धार्मिक परंपरा जोपासत आहेत.
१९९७ पासून, हे गिर्यारोहक दरवर्षी न चुकता नवरात्रीमध्ये शिखरावर घटस्थापना करतात आणि विजयादशमीपर्यंत दररोज कळसुबाई मातेची पूजा-अर्चा करण्यासाठी शिखर सर करतात.
या वर्षी या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मंडळाने स्थापित करावयाच्या घटकलशाचे पूजन करून तो मंडळाला सुपूर्द केला. यावेळी त्यांनी गिर्यारोहकांच्या श्रद्धा आणि साहसाचे कौतुक केले आणि नवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या.
या भेटीदरम्यान, गिर्यारोहकांनी मुख्यमंत्र्यांना शिखरावर आवश्यक सुविधा आणि आधुनिक सोयी उपलब्ध करून देण्याची विनंती केली, तसेच त्यांनी स्वतः कळसुबाई मातेच्या दर्शनासाठी यावे अशी विनवणीही केली.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, पहाटेच मंडळाच्या गिर्यारोहकांनी शिखर सर करून कळसुबाई मातेचे विधिवत पूजन, आरती आणि घटस्थापना केली. सामान्यतः, एकदा शिखर सर केल्यावर गिर्यारोहकांना विश्रांतीची गरज असते, परंतु कळसुबाई मित्र मंडळाचे सदस्य गेल्या तीन दशकांपासून न थकता आणि न थांबता दररोज हे सर्वोच्च शिखर सर करत आहेत. त्यांची ही अविरत भक्ती आणि पराक्रम हेच त्यांच्या श्रद्धेचे खरे प्रतीक आहे.
या स्तुत्य उपक्रमात संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, शाहीर बाळासाहेब भगत, डॉ. महेंद्र आडोळे, डॉ. कैलास गायकर, निलेश आंबेकर, निलेश पवार, प्रवीण भटाटे, बाळू आरोटे, अशोक हेमके, बाळू भोईर, राजेंद्र माने, भगवान तोकडे, नाना टाकळकर, विकास जाधव, गजानन चव्हाण, ज्ञानेश्वर मांडे, चेतन जाधव आणि इतर गिर्यारोहक सहभागी आहेत.
कळसुबाई शिखरावर सुरू असलेली ही भक्ती, शौर्य आणि श्रद्धेची परंपरा केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशभरातील गिर्यारोहक आणि भाविकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.



या भेटीदरम्यान, गिर्यारोहकांनी मुख्यमंत्र्यांना शिखरावर आवश्यक सुविधा आणि आधुनिक सोयी उपलब्ध करून देण्याची विनंती केली, तसेच त्यांनी स्वतः कळसुबाई मातेच्या दर्शनासाठी यावे अशी विनवणीही केली.
या स्तुत्य उपक्रमात संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, शाहीर बाळासाहेब भगत, डॉ. महेंद्र आडोळे, डॉ. कैलास गायकर, निलेश आंबेकर, निलेश पवार, प्रवीण भटाटे, बाळू आरोटे, अशोक हेमके, बाळू भोईर, राजेंद्र माने, भगवान तोकडे, नाना टाकळकर, विकास जाधव, गजानन चव्हाण, ज्ञानेश्वर मांडे, चेतन जाधव आणि इतर गिर्यारोहक सहभागी आहेत.