संगमनेर – पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरी गावाजवळ गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. संगमनेरकडून पुण्याकडे जाणाऱ्या कार आणि समोरून येणाऱ्या आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. एमएच १२ एफ १४२१ क्रमांकाची कार पुण्याकडे जात होती, तर एमएच १३ सीयू ९१५६ क्रमांकाचा आयशर टेम्पो संगमनेरच्या दिशेने येत होता. दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाल्याने कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग केंद्राचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना संगमनेरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या अपघातात कारमधील ५५ वर्षीय सुभद्रा बाळू रुपनर यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यासोबत असलेले राजेंद्र बाळू रुपनर (वय ३८), संजय बाळू रुपनर (वय ३७) आणि मास्टर आरुष राजेंद्र रुपनर (वय ११) हे देखील जखमी झाले. दुर्दैवाने, याच अपघातात ४० वर्षीय लता काळे यांचा मृत्यू झाला. हे सर्वजण बजरंग वाडी, कर्जत येथील रहिवासी आहेत.
या मार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाका ते जावळे वस्ती या भागात सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. यामुळे अनेकदा अपघात घडत आहेत. एकेरी वाहतुकीमुळे आणि ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अनेक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे महामार्गावरील दुहेरी वाहतूक कधी सुरू होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरीजवळ भीषण अपघात, महिलेचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी
सर्वजण बजरंग वाडी, कर्जत येथील रहिवासी आहेत.





या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
या अपघातात कारमधील
या मार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाका