Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वाढत्या उष्णतेचा धोका; नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी – डॉ. जयश्रीताई थोरात यांचे आवाहन
आरोग्य

वाढत्या उष्णतेचा धोका; नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी – डॉ. जयश्रीताई थोरात यांचे आवाहन

कोणाला उष्णतेमुळे शारीरिक त्रास जाणवू लागला, तर घरगुती उपाय करत न बसता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घ्यावेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

राज्यात सध्या सर्वत्र उष्णतेचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढत असून, येत्या काही दिवसांत हा तडाखा अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा आणि प्रख्यात कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला आहे.

यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक असून अहिल्यानगर जिल्ह्याचे तापमान ४१.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचे सावट असून, संगमनेर परिसरातही ही तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने लोकांची ये-जा वाढली आहे. अशा वेळी अनेक युवक कडक उन्हात डोक्यावर कोणतीही टोपी किंवा रुमाल न घेता फिरताना दिसतात. हा अतिआत्मविश्वास आरोग्यासाठी घातक ठरू शकतो आणि यामुळे उष्माघाताचा (सनस्ट्रोक) मोठा धोका निर्माण होतो, असे डॉ. थोरात यांनी आवर्जून नमूद केले आहे.

आरोग्य जपण्यासाठी आहारावर नियंत्रण मिळवणे आवश्यक असल्याचे सांगताना डॉ. थोरात यांनी स्पष्ट केले की, उन्हाळ्याच्या दिवसात उच्च प्रथिने असलेले जड अन्न आणि शिळे अन्न खाणे टाळावे. त्याऐवजी हलका आहार घ्यावा आणि सुती, सौम्य रंगाचे कपडे वापरावेत. शरीराला थंडावा देण्यासाठी चहा, कॉफी किंवा कृत्रिम थंड पेयांपेक्षा लिंबू पाणी, ताक आणि शहाळ्याचे पाणी यांसारख्या नैसर्गिक घरगुती पेयांना पसंती द्यावी. धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने आरोग्यासाठी वेळ काढणे ही काळाची गरज बनली आहे.

विशेषतः वयोवृद्ध नागरिकांनी उन्हाच्या तीव्रतेपासून स्वतःला सुरक्षित ठेवावे, कारण वाढत्या तापमानाचा त्यांच्या आरोग्यावर लवकर परिणाम होऊ शकतो. जर कोणाला उष्णतेमुळे शारीरिक त्रास जाणवू लागला, तर घरगुती उपाय करत न बसता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घ्यावेत. ‘स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि स्वस्थ, मस्त व जबरदस्त रहा’ अशा शब्दांत डॉ. जयश्रीताई थोरात यांनी नागरिकांना आरोग्याचा मंत्र दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 580
आवाहन जयश्री थोरात तापमान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नशामुक्त श्रीरामपूरचा ध्यास: उद्या शहरात भव्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे श्रीरामपूर पोलिसांचे आवाहन

20/08/2026

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला युवकांचा वाढता प्रतिसाद, फ्रेंडशिप डेच्या संदेशातून ९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाचे आवाहन

02/08/2026

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

25/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

By Annant Ppangarkar25/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  विशेष प्रतिनिधी / मुंबई: मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजाची शिस्त आणि…

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.