केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत
या संदर्भात येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, स्थानिक आमदार, मंत्री छगन भुजबळ आणि बदापूर ग्रामपंचायत यांना लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे



परिस्थिती एवढी गंभीर बनली आहे की, मागील ७ ते ८ दिवसांत हे रासायनिक सांडपाणी स्थानिक तलावात जाऊन मिसळल्यामुळे तलावातील शेकडो मासे मोठ्या प्रमाणावर मरून पडले आहेत. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

