संगमनेर – अनेकदा राजकीय भूमिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीवर टीका करणाऱ्या त्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाचा धागा पकडत योग्य व्यासपीठावर योग्य मुद्दा मांडल्याचे स्पष्ट करत त्यांचे कौतुक केले. थोरात यांच्या या विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अनुक्रमे एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह बहुतांश मंत्री रविवारी अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी साखर कारखानदारीवर मोठे भाष्य केले. फडणवीस यांच्या या वक्तव्याची चर्चा राज्यभरात सुरु आहे.
थोरात सोमवारी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी बोलताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये साखर कारखान्यांमधून शेतकऱ्यांचा काटा मारला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करून कारवाई करणार असल्याचे म्हटले. हे अत्यंत अभिनंदनीय आहे आणि अशा कारखान्यांवर कारवाई झालीच पाहिजे, असे थोरात म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयातून शेतकऱ्यांचा फायदाच होणार असून, मुख्यमंत्र्यांनी योग्य व्यासपीठावर योग्य मुद्दा मांडल्याने त्यांचे अभिनंदन करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
माजी मंत्री बाळासाहेब थोरातांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक… नेमकं काय आहे कारण!
साखर कारखान्यांमधून शेतकऱ्यांचा काटा मारला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करून कारवाई करणार असल्याचे म्हटले. हे अत्यंत अभिनंदनीय आहे आणि अशा कारखान्यांवर कारवाई झालीच पाहिजे



संगमनेर – अनेकदा राजकीय भूमिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीवर टीका करणाऱ्या त्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाचा धागा पकडत योग्य व्यासपीठावर योग्य मुद्दा मांडल्याचे स्पष्ट करत त्यांचे कौतुक केले. थोरात यांच्या या विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगले आहे. 
थोरात सोमवारी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी बोलताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये साखर कारखान्यांमधून शेतकऱ्यांचा काटा मारला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करून कारवाई करणार असल्याचे म्हटले. हे अत्यंत अभिनंदनीय आहे आणि अशा कारखान्यांवर कारवाई झालीच पाहिजे, असे थोरात म्हणाले. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयातून शेतकऱ्यांचा फायदाच होणार असून, मुख्यमंत्र्यांनी योग्य व्यासपीठावर योग्य मुद्दा मांडल्याने त्यांचे अभिनंदन करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.