संगमनेर – संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध प्रलंबित समस्या आणि शेतकरी, व्यापारी, हमाल, माथाडी कामगार यांच्या व्यापक हितासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबई येथे भेट घेऊन प्रभावी पाठपुरावा केला. या भेटीत बाजार समितीच्या एकूण कार्यप्रणालीत अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक बदल घडवून आणण्यासाठी सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.
आमदार तांबे यांनी बाजार समितीच्या आर्थिक सुविधा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता बोलून दाखवली, तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर आणि थेट फायदा मिळेल अशा उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी केली. त्यांनी विशेषतः बाजार समितीतील व्यवहारात पूर्ण पारदर्शकता आणणे, हमाल-माथाडी कामगारांच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण करणे, व्यापाऱ्यांसाठी सुलभ आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मुद्दे मांडले.
या महत्त्वाच्या चर्चेनंतर राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बाजार समितीच्या विकासाशी संबंधित काही महत्त्वाचे विषय तातडीने मार्गी लावण्यात आल्याचे सांगितले. तसेच, उर्वरित प्रलंबित विषयांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या भेटीनंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या तालुक्याची अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी (आर्थिक कणा) आहे. तिच्या कार्यक्षमतेत वाढ झाली, तर शेतकरी आणि व्यापारी या दोघांच्याही हिताचे मोठे काम होईल. मी जे मूलभूत प्रश्न मांडले आहेत, त्यावर पणन मंत्री महोदयांकडून येणाऱ्या काळात सकारात्मक आणि ठोस कार्यवाही होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
आमदार तांबे यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे संगमनेर बाजार समितीच्या विकासाला आणि तेथील संबंधितांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संगमनेर बाजार समितीच्या प्रलंबित प्रश्नांवर मुंबईत खलबतं; आमदार तांबे-मंत्री रावल यांच्या भेटीत महत्त्वाचे निर्णय!
आमदार तांबे यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे संगमनेर बाजार समितीच्या विकासाला आणि तेथील संबंधितांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



संगमनेर – 
या महत्त्वाच्या चर्चेनंतर राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सकारात्मक
