संगमनेर: शुक्रवारी रात्री घोडेकर मळ्यामध्ये म्हाळुंगी नदीच्या पुलावर गुन्हेगारांकडून घरी परतणारा तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी असलेल्या या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात प्रभाग १३ मधील रहिवाशांनी एकत्रित येत सराईत गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली आहे.
शुक्रवारी (१७ ऑक्टोंबर) रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान शुभम सुरेश भोईर हा तरुण कापड दुकानातील काम संपवून घरी परतत असताना साईनगर परिसरातील म्हाळुंगी नदीच्या पुलावर काही सराईतानी त्याला अडवले. त्याच्याकडून पैसे जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. शुभम भोईर याने विरोध करताच, या गुन्हेगारांनी त्याला जबर मारहाण केली, तसेच धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले.
या गुन्हेगारी कृत्यामुळे संगमनेर शहरात सराईत गुन्हेगारांची दहशत वाढली असल्याचे समोर आले असून, रात्री-अपरात्री निष्पाप नागरिकांना अडवून त्यांच्याकडील पैसे, दागिने हिसकावणे तसेच विरोध केल्यास गंभीर मारहाण करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या संदर्भात प्रभाग क्र. १३ मधील चव्हाणपुरा, साईनगर, घोडेकर मळा आदी परिसरातील रहिवाशांनी आज, शनिवारी (१८ ऑक्टोबर) संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी शहरात वारंवार घडणाऱ्या गंभीर गुन्हेगारी घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, या घटनेतील आरोपी हे तेच तेच असून त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. कायद्याचा धाक न राहिलेल्या या गुन्हेगारांमुळे शहरात कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. गुन्हेगारीचे गांभीर्य लक्षात घेऊन, नागरिकांनी या टोळीवर तातडीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तसेच, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी या सराईत गुन्हेगारांवर मोक्का (MCOCA) आणि एमपीडीए (MPDA) कायद्यांतर्गत कठोर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई न केल्यास, ऐन दिवाळीत प्रभाग क्र. १३ मधील चव्हाणपुरा, साईनगर, घोडेकर मळा, पंपिंग स्टेशन, जेधे कॉलनी, काठे मळा या भागातील नागरिक एकत्र येऊन मोठे जनआंदोलन उभे करतील, असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संगमनेर शहर पोलीस स्टेशनची असेल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
संगमनेरात गुन्हेगारांचा उच्छाद! घरी परतणाऱ्या तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; आरोपींना ‘मोक्का’ लावण्याची मागणी
अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी या सराईत गुन्हेगारांवर मोक्का (MCOCA) आणि एमपीडीए (MPDA) कायद्यांतर्गत कठोर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.




शुक्रवारी (१७ ऑक्टोंबर) रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान शुभम सुरेश भोईर हा तरुण

या संदर्भात प्रभाग क्र. १३ मधील

तसेच, अशा घटना पुन्हा घडू नयेत

