संगमनेर – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांची सखोल पडताळणी (Systematic Inspection of Rolls – SIR) मोहीम राबवावी, या मागणीसाठी ‘राहुल गांधी समर्थक संघ’ आक्रमक झाला आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (मंगळवारी 28 ऑक्टोबर) संगमनेरच्या तहसीलदारांना याबाबत लेखी निवेदन देऊन तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याच्या तक्रारी वारंवार विविध माध्यमांतून समोर आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी या याद्यांची SIR द्वारे सखोल पडताळणी होणे अत्यंत आवश्यक आहे.
राज्यव्यापी संघटनेने निवेदनात केरळ राज्याच्या परिस्थितीचा दाखला दिला आहे. पुढच्या महिन्यात केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, तेथे सध्या मतदार याद्यांची सखोल पडताळणी मोहीम (SIR) जोरात सुरू आहे. याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळच्या निवडणुकीची अधिसूचना अद्याप निघाली नसल्याने तेथे SIR सुरू आहे.
‘समान परिस्थितीत वेगवेगळे निकष का?’ – संघाचा सवाल:
राहुल गांधी समर्थक संघाने याच मुद्द्यावर निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणतात की, जर मतदार याद्यांमधील घोळ सिद्ध झाला असेल आणि SIR न राबवण्यास केवळ ‘निवडणूक अधिसूचना’ हाच एकमेव अडथळा असेल, तर महाराष्ट्र आणि संगमनेरमध्ये ही प्रक्रिया राबवण्यास कोणतीही हरकत नसावी.
वास्तविक पाहता, केरळ आणि महाराष्ट्रातील परिस्थिती समान आहे आणि दोन्ही राज्यांचे निवडणूक वेळापत्रक समान आहे. असे असतानाही, या दोन्ही राज्यांसाठी वेगवेगळे निकष लावण्यामागे निवडणूक आयोगाचा नेमका काय हेतू आहे, याचा खुलासा सर्वसामान्य मतदारांपुढे होण्याची गरज आहे.
निवेदनाच्या समारोपामध्ये राहुल गांधी समर्थक संघाने निवडणूक प्रक्रियेवरील देशातील जनतेचा विश्वास पुनश्च बहाल करण्यासाठी निवडणूक आयोगाने तहसीलदारांमार्फत निष्पक्ष काम करावे, अशी भूमिका मांडली आहे. तहसीलदारांनी आपल्या मागणीचा गंभीर्याने विचार करून राज्य निवडणूक आयोगास योग्य तो पत्रव्यवहार करावा आणि ही मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
नायब तहसीलदारांनी संघटनेचे निवेदन स्वीकारले असून, तहसीलदारांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात राहुल गांधी समर्थक संघ, महाराष्ट्राचे पदाधिकारी अमोल शेलकर, राम अरगडे, प्रकाश कडलग, सतीश खताळ, मोहसीन शेख, कल्याण जोर्वेकर, अरुण गावित्रे अक्षय मोहिते, शंतनू भालेकर, रवींद्र हासे अनिल राऊत, भारत कळसकर आदींचा समावेश होता.
मतदार याद्या पडताळणीसाठी (SIR) संगमनेरमध्ये राहुल गांधी समर्थक संघ आक्रमक! तहसीलदारांना निवेदन
वास्तविक पाहता, केरळ आणि महाराष्ट्रातील परिस्थिती समान आहे आणि दोन्ही राज्यांचे निवडणूक वेळापत्रक समान आहे. असे असतानाही, या दोन्ही राज्यांसाठी वेगवेगळे निकष लावण्यामागे निवडणूक आयोगाचा नेमका काय हेतू आहे,





‘समान परिस्थितीत वेगवेगळे निकष का?’ – संघाचा सवाल:
निवेदनाच्या समारोपामध्ये राहुल गांधी समर्थक संघाने निवडणूक प्रक्रियेवरील देशातील जनतेचा विश्वास पुनश्च बहाल करण्यासाठी निवडणूक आयोगाने