Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

21/08/2026

आज शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

21/08/2026

नशामुक्त श्रीरामपूरचा ध्यास: उद्या शहरात भव्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे श्रीरामपूर पोलिसांचे आवाहन

20/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती! संगमनेरची जबाबदारी असेल या अधिकाऱ्यांवर…
निवडणूक

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती! संगमनेरची जबाबदारी असेल या अधिकाऱ्यांवर…

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्व नियुक्त अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाचे नियम आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी आदेशांचे तंतोतंत पालन करून नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका २०२५ शांततेत, पारदर्शकतेने व सुव्यवस्थित पार पाडाव्यात, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/11/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शासकीय निकषांनुसार निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुकीस मंजुरी देणारे आदेश नुकतेच जारी केले आहेत.

प्रशासकीय अधिकाऱ्यांवर निवडणुकीची मोठी जबाबदारी… निवडणुकांचे सर्व कामकाज शांततेत, पारदर्शकतेने आणि सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासकीय सेवेतील अनुभवी अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी यांचा समावेश आहे. हे नियुक्त अधिकारी निवडणुकीदरम्यान राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करतील.

जिल्ह्यातील विविध नगरपरिषदांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी खालीलप्रमाणे

  • कोपरगाव: श्रीमती भारती सागरे (उपजिल्हाधिकारी) या निवडणूक निर्णय अधिकारी असतील. त्यांना महेश सावंत व सुहास जगताप मदत करतील.
  • संगमनेर: अरुण ऊंडे (उपविभागीय अधिकारी) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून, धीरज मांजरे व श्रीमती धनश्री पवार सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतील.
  • श्रीरामपूर: किरण सावंत पाटील (उपविभागीय अधिकारी) निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळतील. त्यांना मिलींदकुमार वाघ व मच्छिंद्र घोलप सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमले आहेत.
  • जामखेड: नितिन पाटील (उपविभागीय अधिकारी) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. अजय साळवे आणि मच्छिंद्र पाडळे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील.
  • शेवगाव: प्रसाद मते (उपविभागीय अधिकारी) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आकाश दहाडदे आणि श्रीमती विजया घाडगे यांची नियुक्ती झाली आहे.
  • पाथर्डी: सुभाष दळवी (उपजिल्हाधिकारी) यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून झाली आहे, तर उध्दव नाईक आणि दिग्विजय पाटील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यभार पाहतील.
  • राहाता: श्रीमती मनिषा राशीनकर (उपजिल्हाधिकारी) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोल मोरे व वैभव लोंढे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतील.
  • राहुरी: अनुपसिंह यादव (उपजिल्हाधिकारी) हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील, तर नामदेव पाटील आणि सोपान बाचकर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नेमले गेले आहेत.
  • देवळाली प्रवरा: श्रीमती गौरी सावंत (उपजिल्हाधिकारी) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड झाली असून, ऋषिकेश पाटील व डी.पी. शेकटकर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतील.
  • नेवासा (नगरपंचायत): सुधीर पाटील (उपविभागीय अधिकारी) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. त्यांना संजय बिरादार व निखिल फराटे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मदत करतील.
  • शिर्डी: माणिक आहेर (उपविभागीय अधिकारी) हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील. सतिश दिघे आणि बी.बी. मुळे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
  • श्रीगोंदा: श्रीकुमार चिंचकर (उपविभागीय अधिकारी) हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यभार पार पाडतील, तर सचिन डोंगरे व श्रीमती पुष्पगंधा भगत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमले गेले आहेत.

शांततेत निवडणुका पार पाडण्याचे निर्देश… जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्व नियुक्त अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाचे नियम आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी आदेशांचे तंतोतंत पालन करून नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका २०२५ शांततेत, पारदर्शकतेने व सुव्यवस्थित पार पाडाव्यात, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या नेमणुकांमुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया आता लवकरच गतिमान होईल, असे स्पष्ट झाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 662
नगरपरिषद निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्ती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

25/05/2026

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला, आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा विजय

04/05/2026

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी रणधुमाळी सुरू; १२ मे रोजी मतदान आणि निकाल, पाहा संपूर्ण वेळापत्रक!

16/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

By Annant Ppangarkar21/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा, मावा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची विक्री…

आज शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

21/08/2026

नशामुक्त श्रीरामपूरचा ध्यास: उद्या शहरात भव्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे श्रीरामपूर पोलिसांचे आवाहन

20/08/2026

संगमनेरात राजस्थान युवक मंडळातर्फे २२ ऑगस्टपासून चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमाला!

20/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.