Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, रविवार २६ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 26, 2026

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निवडणूक आयोग सत्तेचा गुलाम झाला! – बाळासाहेब थोरात यांची टीका; EVM वर गंभीर आक्षेप
राजकारण

निवडणूक आयोग सत्तेचा गुलाम झाला! – बाळासाहेब थोरात यांची टीका; EVM वर गंभीर आक्षेप

आमदार सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कायम विकासाची कामे केल्याचे नमूद केले.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 3, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर टीका करत, आयोग पूर्णपणे सत्तेचा गुलाम झाल्याचे म्हटले आहे. निवडणूक कार्यक्रम मंत्रालयातील कोणीतरी पीए ठरवत असून आयोग त्याची अंमलबजावणी करत असल्याचा खळबळजनक आरोप थोरात यांनी केला. तसेच, मतदान आणि मतमोजणीतील २० दिवसांच्या अंतरावर आक्षेप घेत, EVM (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) पेट्यांच्या सुरक्षेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, राज्यघटना आणि लोकशाही टिकवण्यासाठी मतदान प्रक्रिया निर्वेधपणे पार पडणे अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु सध्या गोंधळाची परिस्थिती आहे. दोन दिवसांवर निवडणूक प्रक्रिया येते आणि अचानक मतदान स्थगित केले जाते, असा प्रकार यापूर्वी कधीच घडला नाही. सावळा गोंधळ चालू असल्याचे दिसते, असे ते म्हणाले.

थोरात यांनी स्पष्ट मत व्यक्त केले की, निवडणूक आयोगाने मतदानासाठी निर्दोष कार्यक्रम जाहीर केला पाहिजे. मात्र असे होत नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. निवडणूक आयोगातील अधिकारी उच्च पदस्थ आणि अनुभवी असूनही ते सत्तेच्या दबावाखाली काम करत आहेत. निवडणूक आयोग स्वतंत्रपणे निर्णय घेत नाही, तर मंत्रालयातील पीए कार्यक्रम आखतो आणि आयोग तो जाहीर करतो, अशी थेट टीका त्यांनी केली.

थोरात यांनी मतदार याद्यांमधील गोंधळावरही तीव्र आक्षेप घेतला. या त्रुटींबाबत वारंवार दाद मागूनही राजकीय हस्तक्षेपामुळे त्यात सुधारणा होत नसल्याचे ते म्हणाले. “मतदार यादीतील गोंधळ आणि ईव्हीएमबाबत ते (सत्ताधारी) काहीही करू शकतात, हे सर्व देशाने पाहिले आहे,” असे सांगत त्यांनी EVM आणि संपूर्ण प्रक्रियेवरच शंका उपस्थित केली.

राज्यघटना आणि देश टिकवण्यासाठी लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. मतदान प्रक्रिया निर्वेधपणे पार पडली तरच लोकांचा लोकशाहीवर विश्वास राहील. आज मतदान झाल्यानंतर उद्याच मतमोजणी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. कारण २० दिवसात ईव्हीएम पेट्यांचे काय होईल, याबाबत सर्व देशातील जनतेला शंका आहे. सत्ताधाऱ्यांचे वागणे असे आहे की शंका येणे साहजिक आहे, असे मत थोरात यांनी व्यक्त केले.

दरम्यान, तब्बल ९ वर्षांनंतर संगमनेर पालिकेची निवडणूक होत असल्यामुळे नागरिकांमध्ये मतदानाबद्दल मोठा उत्साह दिसून आला. सकाळीच नागरिकांनी प्रत्येक मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या.

यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कायम विकासाची कामे केल्याचे नमूद केले. संगमनेर तालुका आणि शहर हे एक परिवार असून जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. सेवा समितीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास तांबे यांनी व्यक्त केला.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 808
निवडणूक बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, रविवार २६ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 26, 20260

आजचे राशीभविष्य ​मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या…

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.