खाणीत बुडून दोन सख्ख्या भावांचा अंत; मुंबईहून परतताच बाळासाहेब थोरातांनी गाठले तिगाव, सानप कुटुंबाचे केले सांत्वन
आपला मुंबई दौरा आटोपून परतताच त्यांनी थेट तिगाव येथे धाव घेतली. कुटुंबप्रमुख या नात्याने त्यांनी मृत मुलांच्या मातोश्री मनीषा सानप व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.


महेश गोरखनाथ सानप (वय १८) आणि ओंकार गोरखनाथ सानप (वय १४) या मृत पावलेल्या दोन तरुण मुलांचा अशा प्रकारे अचानक झालेला अंत पाहून बाळासाहेब थोरात स्वतः भावूक झाले होते. त्यांनी सानप कुटुंबाला धीर देत, या कठीण काळात संपूर्ण तालुका आणि ग्रामस्थ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, अशी ग्वाही दिली.
या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, अवघ्या एक वर्षापूर्वीच वडिलांचे छत्र हरपलेल्या या सानप कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

