लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप
या सरकारमध्ये समाज कल्याण खाते शिवसेनेकडे (शिंदे गट) असतानाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्री यावर काहीच बोलत नाहीत, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.



समाज कल्याण विभागाच्या मूळ योजनांचे काय होणार, असा सवाल उपस्थित करत रूपवते यांनी प्रशासकीय ढिसाळपणावर बोट ठेवले. सरकारने समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, घरकुल योजना आणि इतर कल्याणकारी योजना पुढे कशा चालवायच्या, याचे कोणतेही ठोस नियोजन केलेले नाही. या योजनांचे भवितव्य वाऱ्यावर सोडून केवळ लाडकी बहीण योजना कशी सुरू राहील, यासाठीच सरकारची धडपड सुरू आहे. अशा पद्धतीने निधी वळवल्यामुळे मागासवर्गीय समाजाच्या विकासाला मोठा खिळ बसेल आणि या विभागाच्या योजना बंद पडण्याच्या मार्गावर येतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
वंचित बहुजन आघाडीचा लाडकी बहीण योजनेला विरोध नाही, ही योजना सुरूच राहिली पाहिजे, अशी भूमिका उत्कर्षाताई रूपवते यांनी स्पष्ट केली. मात्र, त्यासाठीचे आर्थिक नियोजन करण्यात महायुती सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. विशेषतः अर्थखाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली चूक कबूल करून यामध्ये तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा हक्काचा निधी हिरावून घेतल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून जाब विचारेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.