ग्रामीण भागातील सायंकाळचे लोडशेडिंग तात्काळ बंद करा; आमदार अमोल खताळ यांची विधानसभेत आक्रमक मागणी
राज्यात कुठेही लोडशेडिंग होत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असले, तरी संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील वस्तुस्थिती अत्यंत वेगळी असल्याचे आमदार खताळ यांनी निदर्शनास आणून दिले



राज्यात कुठेही लोडशेडिंग होत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असले, तरी संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील वस्तुस्थिती अत्यंत वेगळी असल्याचे आमदार खताळ यांनी निदर्शनास आणून दिले.
सध्या ग्रामीण भागातील नागरिकांना दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत वीजपुरवठा खंडित होण्याचा सामना करावा लागत आहे. ही वेळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची, शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामांची तसेच व्यापाऱ्यांच्या व्यवसायाची असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. वारंवार होणाऱ्या वीजखंडितीमुळे घरगुती कामकाज, लघुउद्योग, व्यावसायिक व्यवहार आणि कृषी क्षेत्रावरही अत्यंत प्रतिकूल परिणाम होत आहे.