Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम

27/08/2026

संगमनेरचा ईद ए मिलाद जुलूस शांततेत पार; आयोजक, नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक!

27/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरकरांच्या हक्काची रेल्वे शिर्डीकडे पळवली; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप, संगमनेरकरांनी आता रस्त्यावर उतरावे!
आंदोलन

संगमनेरकरांच्या हक्काची रेल्वे शिर्डीकडे पळवली; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप, संगमनेरकरांनी आता रस्त्यावर उतरावे!

हा प्रश्न अत्यंत गंभीर असून केवळ नेत्यांनी बोलून सुटणारा नाही, तर सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र होऊन आपल्या हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
नाशिक-पुणे रेल्वे मार्ग बदलल्याच्या निषेधार्थ संगमनेरकरांनी आता आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेकांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली पुणे, चाकण, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर ते नाशिक असा रेल्वेमार्ग निश्चित करण्यात आला होता. या मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून भूसंपादन प्रक्रियाही मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्यात आली होती, तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी ७०० कोटी रुपयांहून अधिक रक्कमही वाटप झाली होती.
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अनेक बैठका घेऊन सुपीक जमीन, वनक्षेत्र आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन हा मार्ग निश्चित केला होता, मात्र महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर २०२४ नंतर हा मार्ग बदलण्यात आल्याचा गंभीर आरोप डॉ. थोरात यांनी केला आहे.
सध्याचे पालकमंत्री याविषयी वेगवेगळे दावे करत असून कधी रेल्वे शिर्डीमार्गे तर कधी देवठाणमार्गे प्रस्तावित असल्याचे सांगितले जाते. परंतु, मूळ मंजूर मार्ग रद्द करून संगमनेरच्या वाट्याला आलेली रेल्वे शेजारच्या तालुक्याकडे वळविण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संगमनेर हा सहकार, शिक्षण आणि व्यापाराच्या क्षेत्रात राज्यातील एक आदर्श तालुका असून, येथील २५ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण आणि रोजगारासाठी पुण्यात आहेत. रेल्वेची सुविधा उपलब्ध झाली असती तर पुणे-संगमनेर हे अंतर अवघ्या दोन तासांत पार करता आले असते, मात्र आता नागरिकांना पाच ते सहा तासांचा बसप्रवास करावा लागतो आणि अनेक युवक जीव धोक्यात घालून दुचाकीने प्रवास करतात, ज्यातून अनेक अपघात घडले आहेत.
हा प्रश्न अत्यंत गंभीर असून केवळ नेत्यांनी बोलून सुटणारा नाही, तर सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र होऊन आपल्या हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे, असे सांगत त्यांनी जनतेला रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. युवक काँग्रेसच्या वतीने यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असून, हक्काची रेल्वे मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. चळवळीतून घडलेला हा तालुका असून संघर्ष हा आमच्या रक्तात आहे. हक्काची रेल्वे मिळविण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 475
आंदोलन आवाहन जयश्री थोरात नाशिक पुणे रेल्वे मार्ग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नशामुक्त श्रीरामपूरचा ध्यास: उद्या शहरात भव्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे श्रीरामपूर पोलिसांचे आवाहन

20/08/2026

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar27/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर पारेगाव बुद्रुक…

५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम

27/08/2026

संगमनेरचा ईद ए मिलाद जुलूस शांततेत पार; आयोजक, नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक!

27/08/2026

आज गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

27/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.