Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या; संगमनेर येथील सोहळ्यात पानिपतकार विश्वास पाटील यांची मागणी

17/08/2026

निझर्णेश्वर मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा करणार: आमदार अमोल खताळ

17/08/2026

संगमनेरकरांचे स्वप्न अखेर पूर्ण! आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश, जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण!

17/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या; संगमनेर येथील सोहळ्यात पानिपतकार विश्वास पाटील यांची मागणी
सामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या; संगमनेर येथील सोहळ्यात पानिपतकार विश्वास पाटील यांची मागणी

सोहळ्यात मातंग समाजातील पहिल्या महिला आयएएस अधिकारी ठरलेल्या प्रेरणा खवळे यांच्यासह प्रा. रघुनाथ खरात यांना 'जीवनगौरव' तर डॉ. साहेबराव गायकवाड, डॉ. भाऊसाहेब पवार, प्रा. तुकाराम सोळशे, प्राचार्य काळूराम बोरुडे, मिराबाई आव्हाड आणि प्राचार्य चंद्रकांत चव्हाण यांना 'समाजभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर:

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे आणि महानगरीय साहित्याचा पाया रचणारे सत्यशोधक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करावा, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांनी केली. 

मालपाणी लॉन्स येथे आयोजित अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती सोहळा व गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. या सोहळ्यात मातंग समाजातील पहिल्या महिला आयएएस अधिकारी ठरलेल्या प्रेरणा खवळे यांच्यासह प्रा. रघुनाथ खरात यांना ‘जीवनगौरव’ तर डॉ. साहेबराव गायकवाड, डॉ. भाऊसाहेब पवार, प्रा. तुकाराम सोळशे, प्राचार्य काळूराम बोरुडे, मिराबाई आव्हाड आणि प्राचार्य चंद्रकांत चव्हाण यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विश्वास पाटील म्हणाले की, अण्णाभाऊंचे जीवन अत्यंत संघर्षाचे होते आणि त्यांच्या ‘फकीरा’ व ‘माकडीचा चाळ’ या कादंबऱ्या साहित्य जगतासाठी अजिंठा-वेरूळसारख्या अमूल्य कलाकृती आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, याबद्दल खंत व्यक्त करत त्यांनी अण्णाभाऊंना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केली.

कार्यक्रमात बोलताना काँग्रेसच्या अनुसूचित जाती-जमाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी महापुरुषांना एका ठरावीक जातीत न बांधता त्यांच्या मानवतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले, तसेच संविधानाचे रक्षण करणे हीच काळाची गरज असल्याचे सांगितले.

आमदार सत्यजित तांबे यांनी तरुणांना सॅल्यूट मारण्याऐवजी सॅल्यूट घेणारे अधिकारी बनण्याचा सल्ला दिला, तसेच संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासोबतच अण्णाभाऊ साठे यांचे अद्यावत स्मारक उभारले जाणार असल्याची माहिती दिली.

यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात यांनी अशा व्याख्यानांमुळे तरुणांना योग्य दिशा मिळत असल्याचे सांगत जंतर-मंतरवरील आंदोलनाने विद्यार्थ्यांमध्ये हक्कांची जाणीव निर्माण केल्याचे नमूद केले. तर नवनिर्वाचित आयएएस अधिकारी प्रेरणा खवळे यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना देत विद्यार्थ्यांनी कोणत्याही अडचणींना न घाबरता ध्येयाकडे वाटचाल करावी असा संदेश दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष संतोष गायकवाड यांनी केले, सूत्रसंचालन निलेश पर्बत यांनी तर आभार दत्तात्रय अवचिते यांनी मानले. या सोहळ्याला लोकप्रतिनिधी, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 92
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मातोश्री प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनातूनच हरित भविष्याची पायाभरणी: आमदार अमोल खताळ

16/08/2026

‘पुणे–नाशिक रेल्वे संगमनेरमार्गेच व्हावी’; पुण्यात लवकरच विशेष रेल्वे परिषदेचे आयोजन

14/08/2026

हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले बनावट दारूचे धागेदोरे; आस्थापना कायमस्वरूपी सील करा, शिवसेनेच्या (ठाकरे गट) अमर कतारी यांची मागणी

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या; संगमनेर येथील सोहळ्यात पानिपतकार विश्वास पाटील यांची मागणी

By Annant Ppangarkar17/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे आणि महानगरीय साहित्याचा पाया…

निझर्णेश्वर मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा करणार: आमदार अमोल खताळ

17/08/2026

संगमनेरकरांचे स्वप्न अखेर पूर्ण! आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश, जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण!

17/08/2026

अवैध वाळू वाहतूक पडली महाग! पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर LCB ची धडक कारवाई, ५ लाखांचा मुद्देमालासह दोघे ताब्यात

17/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.