आश्वी परिसरात चोरट्यांचा हैदोस; पोलिसांच्या ढिम्म कारभाराविरोधात नागरिकांचा तीव्र संताप, तक्रारीसाठी ‘उद्या या’ म्हटल्याचा पीडित कुटुंबाचा आरोप
अहिल्यानगरच्या जिल्हा पोलिस प्रमुखांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे, तपासाची सखोल समीक्षा करावी आणि तक्रारदारांना ताटकळत ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करत आरोपींना तात्काळ जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी संपूर्ण परिसरातून केली जात आहे.





