आदिवासी, दलित व श्रमिकांचे खंदे नेते साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्र सेवा दल आणि साथी भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठान, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ४३ व्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या वैचारिक जडणघडणीला आणि सामाजिक भानाला चालना देणारी ही स्पर्धा बुधवार, दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता काशेश्वर विद्यालय, कासारा दुमाला (मालपाणी हेल्थ क्लबजवळ), तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेमध्ये इयत्ता ३ री ते ४ थी, ५ वी ते ६ वी, ७ वी ते ८ वी, ९ वी ते १० वी, ११ वी ते १२ वी आणि खुला गट अशा विविध ६ गटांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, विज्ञान, संविधान, मानवतावाद, राष्ट्रनिर्मिती आणि रेल्वे विकास यांसारखे प्रगल्भ विषय देण्यात आले आहेत. प्रत्येक गटात एका शाळेतील जास्तीत जास्त दोन विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल. स्पर्धेचे प्रवेश शुल्क प्रति विद्यार्थी २० रुपये असून सहभागी विद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांची यादी सोबत जोडणे आवश्यक आहे.
स्पर्धेतील सर्व गुणवंत विजेत्यांना पुस्तकांच्या स्वरूपात बक्षिसे तसेच विशेष स्मृतिचिन्ह देऊन गौरवले जाणार आहे. तसेच सहभागी स्पर्धक व शिक्षकांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील सर्व शाळांनी व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकल्प प्रमुख सोमनाथ मदने, कार्यकारी विश्वस्त राजाभाऊ अवसक आणि सह प्रकल्प प्रमुख भाऊसाहेब शिंदे, नम्रता पवार, अर्जुन वाळके, सुखदेव इल्हे, रजत अवसक व संजय जेडगुले यांनी केले आहे.
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी ९४२२७३१८०९, ९७६५६६७७७२, ९०२८२२१७१७ किंवा ७७९८९९९५१३ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.