रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…
लेखक अमोल शेलकर हे संगमनेर तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत.
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
24 डिसेंबर 2024 रोजी Times of India मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी GMRT हा भारताची दुर्मिळ वैज्ञानिक उपलब्धी असल्याचे सांगितले आणि विकास हा बहुआयामी असतो, त्यामुळे स्थानिक समुदायाच्या चिंता दूर करण्यासाठी चर्चा करून उपाय शोधले पाहिजेत, अशी भूमिका मांडली होती. म्हणजेच प्रश्न ‘GMRT की रेल्वे?’ असा नसून प्रश्न ‘GMRT ला धक्का न लावता रेल्वे कशी नेता येईल?’ हा आहे.
पण आता ६० दिवसांपैकी २५ दिवस संपले आहेत.

