महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

संगमनेर तालुक्यातील राजापूरच्या जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवड प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारींमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास येणारा चौकशी अहवालच पुढील कारवाईची दिशा ठरवणारा ठरणार आहे.

यापूर्वी प्रशासनाकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार गांभीर्याने चौकशी झाल्यास मुख्याध्यापकांकडून पालकांवर दबाव आणणे, नियमबाह्य पद्धतीने समितीची निवड करणे किंवा शासकीय निर्देशांचे उल्लंघन करणे असे गंभीर आरोप पुराव्यानिशी सिद्ध झाल्यास सक्षम प्राधिकरणाकडून संबंधित मुख्याध्यापकांवर नियमानुसार प्रशासकीय व शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.

या संपूर्ण प्रकरणात चौकशी निष्पक्ष होणार का, पालकांचे जबाब नोंदवले जाणार का, तसेच सभेचे प्रोसिडिंग आणि उपस्थितीपत्रक यांची अचूक तपासणी केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी, अन्यथा तक्रारीतील आरोपांमागील वस्तुस्थिती पालकांसमोर उघड करावी, अशी ठाम मागणी पालकांकडून केली जात आहे. आता या सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरे आगामी चौकशी अहवालातूनच समोर येणे अपेक्षित आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply