महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
किरकोळ भांडणातून सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आल्याचा प्रकार नासिकमध्ये समोर आला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच जामीनावर हा आरोपी नाशिक मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला होता. अक्षय उत्तम जाधव असे होऊन झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान अंबड परिसरातील महालक्ष्मी नगरमध्ये किरकोळ भांडणातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमध्ये नाशिक पोलिसांनी तन्मय मनोज गोसावी आणि आकाश अनिल साळुंखे या दोघा संशयतांना सापळा रचून अटक केली आहे.
तर मृत अक्षय उत्तम जाधव याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, शासकीय नोकऱ्यांवर हल्ला, जबरी चोरी, घरफोडी, चोरी यांसारखे १५ गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर अंबड पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत २६ डिसेंबर २०२० ते २५ जून २०२१ पर्यंत अशा सहा महिन्याच्या कालावधीसाठी नाशिक जिल्ह्यातून हद्दपार केले होते. 
पोलिसांनी एका गुन्ह्यात त्याला साथीदारासह अटक करत त्यांच्याकडून ३२ तोळे सोने व साडेदहा लाख रुपये रोख असा घरफोडीचा मुद्देमाल जप्त केला होता. नासिक मध्यवर्ती कारागृहातून तो ८ ऑक्टोबरपासून जामिनावर सुटला होता.
पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे, उपनिरीक्षक संदीप पवार आदींसह गुन्हेशोध पथक व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस पुढील तपास करत आहे.
काय घडली होती घटना
शुक्रवारी रात्रीच्या वेळी संशयित आरोपी तन्मय मनोज गोसावी आणि आकाश अनिल साळुंखे हे महालक्ष्मी नगरमधील आरोग्य केंद्र समोर बसलेले असताना आरोपी अक्षय जाधव हा त्या ठिकाणी साथीदारासह आला होता. त्यावेळी या सर्वांमध्ये वाद झाले. संशयित आरोपीने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने जाधव यांच्या डोक्यात वार केला व घटनास्थळावरून पळून गेला. मी अक्षय ने या घटनेची माहिती अंबड पोलिसांना कळविले घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी जखमी अक्षय जाधव याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.



