संगमनेर – महाराष्ट्र संवाद न्यूज
तू फिर्यादीशी लग्न केलेस काय, तू त्याच्याजवळ झोपतेस अशी विचारणा करत दोघांनी तिचा ब्लाउज फाडून विनयभंग केला तर फिर्यादी घरी परतल्यानंतर त्याला दारातच अडवून बांबू आणि कोयत्याने मारहाण करत जखमी केल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सात आरोपीं विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी कामानिमित्ताने संगमनेर येथे आलेला होता. त्याचवेळी आरोपींनी गैर कायद्याची मंडळी एकत्रित जमवत फिर्यादीच्या घरी जाखुरी येथे जात फिर्यादीकडे कामास असलेल्या महिलेस तू फिर्यादीशी लग्न केलेस काय, तू त्याचे जवळ झोपतेस, असे म्हणत दोघा आरोपींनी तिचा ब्लाउज फाडून तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
या दरम्यान फिर्यादी हा संगमनेर येथून घरी परतला असल्याचे पाहून आरोपींनी फिर्यादीला दारातच पकडत एकाने बांबूने फिर्यादीच्या उजव्या पायाच्या पोटरीवर मारहाण केली तसेच दुसऱ्याने कोयत्याने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या पंजावर मारहाण करत दुखापत केली. तसेच फिर्यादीस शिवीगाळ करत तू दुसरे लग्न करतो असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या संदर्भात शनिवारी रात्री उशिराने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून सात आरोपींनी विरोधात भारतीय दंड विधान कलम 452, 354, 324, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये काही महिलांचा देखील समावेश आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जे. ए. सय्यद पुढील तपास करत आहेत.

