Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 5, 2026

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उद्धव ठाकरे मुरलेले राजकारणी नाहीत, गद्दारांच्या खेळीला वैतागून त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला; यशवंतराव गडाख
महाराष्ट्र संवाद विशेष

उद्धव ठाकरे मुरलेले राजकारणी नाहीत, गद्दारांच्या खेळीला वैतागून त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला; यशवंतराव गडाख

ठाकरे गडाख भेटीत पवार ठाकरे यांच्या मैत्रीला दिला उजाळा
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 12, 2023Updated:May 12, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोनई (महाराष्ट्र संवाद न्यूज)

माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुरलेले राजकारणी नाहीत. गद्दारांच्या खेळीला वैतागून त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असला तरी येणाऱ्या निवडणुकीत जनता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला साथ देईल असा विश्वास माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केला.

अहमदनगर जिल्ह्यातील दिग्गज राजकारणी आणि संयमी नेते म्हणून ओळख असलेल्या साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी त्यांच्या भेटीला आले होते. ठाकरे-गडाख भेटीत गडाख यांनी ठाकरेंचे तोंड भरून कौतुक करत ठाकरे आणि पवार यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

गडाख म्हणाले, ठाकरे कुटुंबाशी आमची मैत्री जुनी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझे संबंध मैत्रीपूर्ण होते. तेच संबंध पुढील काळात उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. उद्धव ठाकरे यांनी जेष्ठांना डावलत शंकररावांना मंत्रीपद दिले. त्यामुळे त्यांची साथ सोडायची नाही, त्यांच्यासोबत ठामपणे राहायचे असा सल्ला आपण शंकररावांना दिला होता.

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला आमदारांची जमवाजमव करायची होती, तेव्हा त्यांनी आमच्याकडे आमदार शंकरराव गडाख यांच्या पाठिंबाबद्दल विचारणा केली. त्यानंतर आमदार शंकरराव गडाख यांनी मुंबईला जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आम्ही ठाकरे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. मंत्रीपद द्या किंवा नका देऊ आम्ही तुमच्या सोबत राहू असा शब्द ठाकरे यांना मी दिला होता.

राज्यात नंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले त्यांनी आमच्या पाठिंबाची जाणीव ठेवत पक्षातील ज्येष्ठांना डावलून शंकररावांना मंत्रिपद दिले. त्यामुळे ठाकरे यांच्यासोबत ठामपणे राहायचे असा सल्ला मी शंकररावांना दिला. मधल्या काळात अनेक प्रलोभने आले मात्र तरीदेखील आम्ही ठाकरे यांची साथ सोडली नसल्याचे गडाख म्हणाले.

२०२४ नंतर पवार देशाचे पंतप्रधान

आत्तापर्यंत शरद पवारांना पंतप्रधान पद मिळू शकले नाही. सध्या देशात त्यांच्या एवढा दुसरा अनुभवी नेता नाही. परिस्थिती बदलली तर २०२४ नंतर ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. वयाची ८० वर्षे पार केल्यानंतर देखील पवार राजकारण आणि समाजकारण सक्रिय आहेत. त्यांची कारकीर्द संघर्षमय राहिली आहे. आजही ते लोकांमध्ये जातात, या वयात अशी हिम्मत दाखविणारे कदाचित ते शेवटचे नेते ठरतील. राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातही त्यांचे वजन आहे.

२०२४ नंतर ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात आत्तापर्यंत दिल्लीतील काँग्रेसमधील चौकडीने त्यांच्याबद्दल श्रेष्ठींचे कान भरले. त्यामुळे या पदासाठी त्यांचे नाव मागे पडत असे. आम्ही मात्र त्यांच्यासोबत कायम राहिलो.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 410
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

विहिरीत आढळलेल्या महिलेची ओळख पटली मृत्यूचे गूढ; पोलिसांकडून तपास सुरू

June 3, 2026

संगमनेरमधील अकोले बायपासवरील भाजीबाजार हटवला; पोलीस आणि भाजीपाला विक्रेत्यांमध्ये प्रचंड हायव्होल्टेज ड्रामा, एक ताब्यात

June 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By अनंत पांगारकरJune 5, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान कमालीचे वाढले आहे.…

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.