महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – अभूतपूर्व असा भगवा मोर्चा संगमनेरमध्ये शांततेत पार पडल्यानंतर संगमनेर जवळील समनापुर गावात दगडफेकीची घटना समोर आले आहे. दगडफेकीत काही चार चाकी आणि दुचाकी वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे. यात दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, देविदास ढुमणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
संगमनेरमधील मोर्चा संपल्यानंतर परत जाणाऱ्यांनी मुस्लिम कुटुंबीयांवर हे दगडफेक केल्याचे म्हटले जाते. संगमनेरहून आपल्या गावाकडे परतत असताना काही समाजकंटक घोषणा देत जात होते. या समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच दगडफेकीत चार-पाच चार चाकी वाहनांचे व तीन चार दुचाकींचे नुकसान करण्यात आले आहे.
मोठ्या प्रमाणात घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करत नाही करण्यात आला असून पोलीस नेमकी घटना कशी घडली याची माहिती घेत आहेत. घटनास्थळी तणावपूर्ण शांतता असून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

